कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात हाहाकार उडाला असताना १२ हजारांहून अधिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. दिवसेंदिवस वाढणारी ही संख्या लक्षात घेता ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेतील वाहतूक वगळता सर्व वाहनांना बंदी करण्यात आले आहे. अशावेळी अनेक अडचणीच्या प्रसंगावेळी पोलीस धाऊन आल्याचे पाहायला मिळाले. असाच एक माणुसकी दर्शविणारा प्रकार उत्तर प्रदेशातील सहारनपूर या भागात समोर आला आहे.
संकटाच्या वेळी मदतीचा हात पोलिसांनी पुढे केल्याच्या अनेक घटना आता पर्यंच सोशल मीडियाद्वारे समोर आल्या आहेत. घरापासून लांब अहोरात्र कर्तव्य निभावणाऱ्या पोलिसांची आणखी एक कामगिरी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एक अनाथ महिलेला रूग्णालयात घेऊन तिच्यावर उपचार करण्यापासून ते तिच्या शेवटच्या श्वसापर्यंत तिची काळजी पोलिसांनी घेतली आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर तिला खांदाही पोलिसांनी दिला.
सहारनपुर में @Uppolice द्वारा मानवता का परिचय देते हुए एक अनाथ महिला का अंतिम संस्कार पुलिस द्वारा विधि विधान से किया गया।
संकट की इस घड़ी में ऐसे उदाहरण ही मिशाल कायम करते हैं। @CMOfficeUP @dgpup @adgzonemeerut @digsaharanpur pic.twitter.com/bG0dmlcKhS— Sapna Kaushik (@advsapnakaushik) April 16, 2020
नातेवाईक नसल्यानं पोलिसांनी घेतली काळजी
उत्तर प्रदेशातील सहारनपूर भागातील घटना असून बडगाव शहरातील किशनपुरा गावात राहणारी महिला कित्येक दिवसांपासून आजारी होती. तिच्या जवळ कोणीही नातेवाईक नसल्याने तिचे यादरम्यान चांगलेच हाल झाले. वयवर्ष ७५ असणाऱ्या या महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर तिच्यावर दुखाःचा डोंगर कोसळली. पैसा नसल्याने तिच्यावर गरिबीची परिस्थिती ओढावली. त्यातच ती आजारी पडली याची माहिती उत्तर प्रदेश पोलीस पथकाला समजताच त्यांनी महिलेला आपल्या गाडीतून घेऊन जात रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांना कुणीही नातेवाईक नसल्यानं त्यांची काळजी पोलीसच घेत होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.
सोशल डिस्टन्सिंग पाळून केले अंत्यसंस्कार
या घटनेची माहिती सोशल मीडियावर मिळताच बडगांवच्या एसएसआय दीपक चौधरी यांनी त्या महिलेची भेट घेतली. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. त्यावेळी दीपक चौधरी यांनी आपल्या पोलिस साथीदारांसह किशनपूर गावात शोक व्यक्त केला. त्यांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा देऊन अंत्ययात्रा काढली आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले. पोलिसांनी या महिलेच्या पार्थिवाला खांदा दिल्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून या प्रकारामुळे गावात त्या सर्व पोलिसांचे कौतुक देखील केले जात आहे.