काश्मिरमध्ये झालेल्या अजय भारती यांच्या हत्येवर आता बॉलीवूडमधूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामाजाक मुद्द्यांवर रोखठोक भूमिका मांडणारी अभिनेत्री कंगना रणावत हिने आपल्या खास शैली या घटचा निषेध नोंदवला आहे. कंगनाने एक व्हिडिओ जारी करत काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसेबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच तिने बॉलीवूड कलाकारांवरही निशाणा साधला आहे.
काय म्हणाली कंगना
बॉलिवूडमधील कलाकार किंवा बुद्धीजीवी समजणारे लोक हातात मेणबत्ती घेऊन, कार्ड्स घेऊन रस्त्यांवर येतात, परंतु त्यांची ही माणूसकी एखादा अजेंडा असल्यावरच बाहेर येते. जोपर्यंत कोणताही अजेंडा नसतो तोपर्यंत असे लोक कोणाच्याही मदतीसाठी पुढे येत नाही. एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी ते पुढे येत नाहीत, अशा शब्दांत कंगनाने बॉलिवूडकरांवर निशाणा साधला आहे. कंगनाने अजय पंडित यांच्या हत्येच्या मुद्द्यावर काश्मीरमधील इस्लामबाबतच्या इतिहासाचाही उल्लेख केला आहे. त्याशिवाय कंगनाने त्यांच्या हत्येबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांच्या न्यायासाठी आणि याप्रकरणी दोषी असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
#KanganaRanaut calls out selective secularism of Bollywood and so-called liberals and urges @narendramodi @PMOIndia to take strict action against atrocities done on #KashmiriPandits and their safe return to their homeland. #AjayPandita #JusticeForAjayPandita pic.twitter.com/gy6PxxkzEh
— Team Kangana Ranaut (@KanganaTeam) June 10, 2020
काय आहे प्रकरण
काही दिवसांपूर्वी काश्मिरच्या अनंतनागग परिसरात अजय भारती या काश्मिरी पंडिताची काही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या या हत्येवर संपूर्ण काश्मिरी पंडितांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्यांची मुलगी शीन पंडित हिनेदेखील दहशतवाद्यांचा बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे. या घटनेवर अभिनेत्री कंगना रणावत हिने बॉलीवूड कलाकार या विषयावर गप्प का, असा सवाल उपस्थित केला आहे.