उत्तर प्रदेशमधील बरेली येथे नसीम नावाच्या व्यक्तीच नईम मन्सूर हिच्याशी २०१३ मध्ये विवाह झाला. त्याला तिच्यापासून तीन मुले आहेत. लॉकडाऊनमुळे नईम तिच्या माहेरी अडकली, त्या दरम्यान नसीमने मावशीच्या मुलीशी परस्पर दुसरा विवाह केला, ही माहिती नईमच्या मुलानेच त्याच्या आईला फोनवरून दिली.
हा धक्कादायक प्रकार समजल्यावर नईम तात्काळ नवऱ्याच्या घरी आली असता तिथे तिचा पती दुसरी पत्नीसोबत राहत असल्याचे पाहिल्यावर तिने यावर आक्षेप घेतला. तिने मेरा हक फाउंडेशन या संस्थेकडे तक्रार केली. तिला आता पतीबरोबर रहायचे नाही, मात्र तिच्यावर अन्याय झाल्याने तिने न्याय मागितला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडितेची बाजू समजून घेतली. पहिल्या पत्नीला धोका देऊन, अंधारात ठेवून दुसरा निकाह केल्याप्रकरणी नसीमच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे. तसेच याप्रकरणी नसीम तेथील दर्ग्याकडे पोहचला, तिथे पंचायत बोलावण्यात आली, तेव्हा पंचायतीने दोन्ही पत्नीसोबत नसीम राहू शकतो, असे सांगितले. मात्र त्याची पहिली पत्नी नईम या निर्णयाला संमत देत नव्हती