घरसंपादकीयदिन विशेषचतुरस्त्र लेखक विष्णू बोकील

चतुरस्त्र लेखक विष्णू बोकील

Subscribe

विष्णू विनायक बोकील हे नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार होते. त्यांचा जन्म २ जून १९०७ रोजी पुणे येथे झाला. नूतन मराठी विद्यालयातून त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि स. प. महाविद्यालयातून उच्च शिक्षण झाले. त्यांनी बी.ए., बी.टी. ही पदवी संपादन केली. त्यांनी नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरी केली. १९४१-४२ च्या सुमारास ‘मंगळागौरीच्या रात्री’ ही बोकीलांची कथा मास्टर विनायकांच्या वाचनात आली आणि त्यांनी बोकीलांना तात्काळ बोलावून त्या कथेचे संवादलेखन करून घेतले. चित्रपट होता ‘पहिली मंगळागौर’. मराठी चित्रपटामध्ये चुंबनदृश्य पडद्यावर प्रथम दाखवणारा हा चित्रपट यशस्वी ठरला.

मास्टर विनायकांनी नवयुगचा त्याग करून ‘प्रफुल्ल चित्र’ ही स्वत:ची संस्था स्थापन केली आणि आपल्या संस्थेसाठी कथालेखन करण्यासाठी बोकील यांना साकडे घातले. बाबूराव पै यांनी बोकील यांच्याकडून ‘गळ्याची शपथ’ हा बोलपट लिहून घेतला. मकरंद भावे यांच्या १९५० मधील ‘जरा जपून’ या विनोदी चित्रपटाचे संवादलेखन बोकील यांनी केले होते. ‘गाठीभेटी’ या बोकील यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरीवरून दत्ता धर्माधिकारींनी ‘बाळा जो जो रे’ (१९५१) हा अत्यंत यशस्वी बोलपट बनवला.

- Advertisement -

तसेच ‘बेबी’ या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीवरून धुळ्याच्या शेठ मगनलाल मोतीलाल यांनी चित्रपट काढला. बोकील यांनीच त्याचे कथा-पटकथा-संवादलेखन केले होते. त्याच सुमारास मराठी चित्रपटसृष्टीत तमाशापटांना बहार आला आणि मध्यमवर्गीय सामाजिक कथेवरचे चित्रपट मागे पडले. अशा परिस्थितीतही त्यांनी ‘यात्रा’, ‘जीवन ऐसे नाव’, ‘सप्तपदी’, ‘वाट चुकलेले नवरे’ हे चित्रपट लिहिले. अशा या चतुरस्त्र लेखकाचे २२ एप्रिल १९७३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -