घरताज्या घडामोडी'या' मालिकेत संग्राम दिसणार खलनायकाच्या भूमिकेत!

‘या’ मालिकेत संग्राम दिसणार खलनायकाच्या भूमिकेत!

Subscribe

‘आई माझी काळुबाई’ ही मालिका  सोनी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झाली आहे. प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्या मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आहे.  संग्राम साळवी हा मालिका विश्वातला नावाजलेला चेहराही या मालिकेत दिसणार आहे. संग्राम या मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून अमोघचा म्हणजेच विवेक सांगळेचा चुलत भाऊ मिलिंद, हे पात्र तो साकारणार आहे.  ‘मिलिंद’ पेशानं पोलीस इन्स्पेक्टर आहे, पण एखाद्या गुंडाला लाजवेल असा उन्मत्त आहे. वडील आमदार, घरची श्रीमंती यांचा माज असलेलं असं त्याचं पात्र  आहे. हे पात्र थोडं खलनायकी असलं, तरी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणारं आहे, असा  विश्वास संग्रामनं दर्शवला आहे.

नुकताच या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे निधन झाले आहे. तर आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

- Advertisement -

या घटनेनंतर पुन्हा एकदा कलाकारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. हलगर्जीपणामुळे जर अभिनेते आणि तंत्रज्ञ यांचा जीव धोक्यात येत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना मालिकांच्या चित्रीकरणास ठामपणे विरोध करेल, असा इशारा अमेय खोपकरांनी दिला आहे. कोरोनामुळे राज्यातील सिनेमा, मालिकांचे शुटींग चार ते पाच महिने पूर्णपणे बंद होते. त्यानंतर सरकारने सशर्त चित्रीकरणाला परवानगी दिल्या नंतर मालिकांच्या शुटींगला सुरूवात झाली.


हे ही वाचा – ड्रग्जचे आरोप होताच दियाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -