घरताज्या घडामोडी'या' अभिनेत्याने सोडली 'ही' मालिका

‘या’ अभिनेत्याने सोडली ‘ही’ मालिका

Subscribe

संकर्षणने मालिका सोडली असल्याचा कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही

छोट्या पडद्यावर फार लवकर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका म्हणजे तुझी माझी रेशमीगाठ. अभिनेत्री प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे तसेच संकर्षण कऱ्हाडे आणि कमी वयात आपल्या सोज्वळ अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली बालकलाकार परी म्हणजेच मायरा. या सर्व कलाकारांनी आपल्या तगड्या अभिनयाने मालिका हिट केली आहे. मात्र यातील एक कलाकार मालिका सोडत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो म्हणजे अभिनेता सकर्षण कऱ्हाडे. संकर्षण अनेक वर्षांनी पुन्हा एकदा मालिकेच्या छोट्या पडद्यावर एंट्री घेतली होती. मलिकेतील यशचा मित्र म्हणजेच समीरची भूमिका संकर्षणे चांगलीच रंगवली होती.मात्र संकर्षण आता मालिकेत दिसणार नसून समीर या पात्राच्या जागी नवीन अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

राज्यातील नाट्यगृहे आणि सिनेमागृहे येत्या २० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. संकर्षणने नाटक मालिका ते सिनेमापर्यंतचा प्रवास करत त्याने आपल्या लोकप्रियेतेची उंची गाठली. राज्य सरकारने नाट्यगृहे सुरू करण्याच्या निर्णयानंतर संकर्षणने पुन्हा एकदा नाटकाकडे वळवण्याचे ठरवले आहे. सकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत असलेला ‘तु म्हणशील तसं’ हे मराठी नाटक लवकरचं रंगभूमीवर येणार आहे. २३ ऑक्टोबरला या नाटकाचा पहिला प्रयोग लागाला असून यामुळेच संकर्षणे माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान संकर्षणने मालिका सोडली असल्याचा कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही.

- Advertisement -

प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन सादरकर्ते गौरी थिएटर्स निर्मित आणि पुणे टॉकीज प्रकाशित ‘तु म्हणशील तसं’ या नाटकात संकर्षण कऱ्हाडे मुख्य भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री भक्ती देसाई देखील मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – Sidnaazची शेवटची केमिस्ट्री, Adhura गाण्याचे पोस्टर रिलीज

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -