घरफिचर्सस्वातंत्र्यसैनिक गोदावरी परुळेकर

स्वातंत्र्यसैनिक गोदावरी परुळेकर

Subscribe

गोदावरी शामराव परुळेकर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1908 रोजी झाला. या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या व लेखिका होत्या. गोदावरी परुळेकर ह्यांचे वडील ख्यातनाम वकील होते. प्रसिद्ध वकील असलेल्या वडिलांनी आपल्या या लेकीला वैचारिक स्वातंत्र्य दिले तसेच कृती करण्यासाठी पाठबळही पुरवले. त्यांच्या घरात आधुनिक वातावरण होते. बी.ए. एलएल.बी. झालेल्या गोदावरीबाई कामगार चळवळीत सामील झाल्या. याच काळात साम्यवादी कार्यकर्ते शामराव परुळेकर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर त्यांना कामगारांच्या विविध प्रश्नांची माहिती झाली. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात त्यांना वरचेवर तुरुंगवासात दिवस काढावे लागले. युद्ध संपल्यानंतर त्या वारली शेतकर्‍यांशी जोडल्या गेल्या. त्या शेतकर्‍यांची वेठबिगारीत दखल घेतली जात नव्हती आणि समाजात त्यांना प्रतिष्ठाही नव्हती. त्यांची सामाजिक उन्नती व्हावी यासाठी वारली शेतकर्‍यांच्या संघर्षाचा त्या एक भाग बनल्या.

1912 मध्ये ना.म. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी परुळेकर यांनी मानद साहाय्यक सचिव म्हणून कामगारांच्या शिक्षणप्रसाराच्या कामात मोलाची भूमिका पार पाडली. गिरगावपासून परळपर्यंतच्या भागात ठिकठिकाणी नागरिकांना वर्तमानपत्रे वाचण्यासाठी केंद्रे सुरू केली. त्यामुळे लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली व त्यांना शिक्षणाची गरज वाटू लागली. याच सुमारास 1917 मध्ये चिंचपोकळी येथे वाचनालय सुरू केले. त्यावेळी त्यांची 11 मोफत ग्रंथालये व 10 मोफत वाचनालये मोफत चालू होती. 1945च्या सुमारास महाराष्ट्र प्रांतिक सभेच्या कामानिमित्त परुळेकर दांपत्य ठाणे जिल्ह्यातील आदिवासी वस्तीच्या डहाणू, तलासरी गावात फिरत असताना तेथील आदिवासींचे गुलामगिरीचे भीषण जीवन पाहून तेथेच काम करायचे त्यांनी ठरवले.

- Advertisement -

त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्या शोषणाविरुद्ध सावकार, जमीनदारांविरुद्ध संघर्ष उभारताना आलेले अनुभव या लढ्याची कहाणी, ‘जेव्हा माणूस जागा होतो’ या पुस्तकात गोदावरीबाईंनी चित्रबद्ध केली. ’जेव्हा माणूस जागा होतो’ या समाजशास्त्रीय ग्रंथातून त्यांनी जमीनदारांकडे पिढ्यानपिढ्या वेठबिगारीने काम करणार्‍या आदिवासी स्त्री पुरुषांचे केलेले भयानक चित्रण अंगावर शहारे आणणारे आहे. आदिवासी समाजाला आपल्या हक्काची जाणीव करून दिल्यावर, माणूस कसा जागा झाला यावर हा ग्रंथ बेतलेला आहे. यातील ‘वेठबिगारी गाडून टाकली’ या प्रकरणातून आदिवासींच्या कोंडलेल्या भावना जागृत होऊन त्यांच्यात नवचैतन्य कसे निर्माण झाले याचे वर्णन केले आहे.

गोदावरीताईंनी वारली समाजातील स्त्रियांवर होणारे अत्याचार पहिले. स्त्रियांवरील या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा निर्णय गोदावरीताईंनी घेतला, परंतु स्त्रियांमध्ये बदल घडवून आणण्याच्या कामात त्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. कारण त्यांच्या लक्षात आले की, वारली आदिवासींच्या कल्पना, आदर्श कृती यामध्ये सुधारणा घडवून आणण्यास शिक्षणाशिवाय अन्य पर्याय नाही. तेव्हा त्यांच्या शिक्षणासाठीच काम करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी त्यांना लढण्याचे बळही गोदावरीताईंनी दिले. त्यासाठी राजकारणाचे प्राथमिक धडेही त्यांनी शिकवले. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन अनेक कार्यकर्ते तयार झाले. गोदावरीताईंनी 8 ऑक्टोबर 1996 रोजी या जगाचा निरोप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -