घरफिचर्सतत्त्वज्ञानाचे व्यासंगी मे. पुं. रेगे

तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मे. पुं. रेगे

Subscribe

मे. पुं. रेगे यांचा आज स्मृतिदिन. मे.पुं. रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. त्यांंचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे नगरपालिका शाळेत झाले. त्यांचे माध्यमिक शिक्षण पार्ले टिळक विद्यालय, किंग जॉर्ज हायस्कूल मुंबई आणि महाविद्यालयीन शिक्षण बी.ए. तत्त्वज्ञान एल्फिस्टन महाविद्यालय, एम. ए. चे शिक्षण मुंबई विद्यापीठ येथे झाले.
मे.पुं. रेगे हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. ते महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ठ्ये होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्विवाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पाश्चात्य तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला.‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’,‘तत्त्वज्ञानातील समस्या’ ही भाषांतरे, ‘नवभारत (मासिक)’ मधील त्यांचे लेख आणि विश्वकोशातील पाश्चात्य तत्त्वज्ञानविषयक व तत्त्ववेत्यांच्या नोंदी पाहता रेगे यांच्या कार्याची, पश्चिमी तत्त्वज्ञान मराठीत आणण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची खात्री पटेल.
मार्च १९९६ मध्ये मुंबई महानगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने मराठी भाषा-स्थिती आणि भवितव्य या विषयावर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी मराठीतील बौद्धिक परंपरेविषयी व त्या अनुषंगाने मराठी भाषा व तिच्या भवितव्याविषयी मर्मभेदक भाष्य केले आहे. ज्ञानभाषा म्हणून मराठी स्थानापन्न होण्यात नेमका कोणता अडथळा होता याची उत्तम मीमांसा त्यांच्या भाषणात आहे.
भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल आहे.
मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ठ्ये होती. त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्विस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले.
त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठ्यपुस्तकांचेही लेखन केले. ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’,‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’,‘स्वातंत्र्य आणि न्याय’,‘हिदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे. रेगे यांचे ‘मर्मभेद’ हे संपादित पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. अशा या महान पश्चिमी तत्वज्ञाचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -