घरमहाराष्ट्रबिबट्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या गावात बिबट्याच्या हल्ल्यात ९ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या गावात बिबट्याच्या हल्ल्यात ९ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वराज गुरनुले असे या चिमकल्याचे नाव आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

काय आहे घटना 

स्वराज घरात झोपलेला असताना बिबट्याने त्याला घरातून पळवून नेले. शोधाशोध केल्यानंतर चिमुकल्याचा मृतदेह सापडला आहे. चिमुकल्या स्वराजला घरात घुसून बिबट्याने पळवून नेत ठार केल्याच्या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील संघारामगिरी (रामदेगी) येथे ध्यानस्थ बसलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला होता. ही घटना गेल्या डिसेंबरमध्ये घडली होती. त्याच प्रमाणे त्यापूर्वी एक महिना आधी नोव्हेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात असलेल्या पोवनपार येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा बळी गेला होता.

- Advertisement -

हेही वाचा –

दुष्काळ हटवण्यासाठी रिक्षाचालकाचा हटके उपक्रम

‘हॉलिडे एक्स्प्रेस’चे डबे घसरले; मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

- Advertisement -

‘देव तारी त्याला कोण मारी’; लोकलमध्ये सापडले सात दिवसांचे अर्भक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -