राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गेल्या २४ तासांत तब्बल ९ हजार ८९५ नव्या रूग्णांची नोंद राज्यात करण्यात आली आहे. तर दिवसभरात २९८ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण ३ लाख ४७ हजार ५०२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ६ हजार ४८४ कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ९४ हजार २५३ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५५.९ % एवढे झाले आहे.
9895 new #COVID19 positive cases and 298 deaths have been reported in Maharashtra today. Total number of positive cases now stand at 3,47,502 including 1,36,980 active cases, 1,94,253 discharged cases and 12,854 deaths: State Health Department pic.twitter.com/atbGkz0prM
— ANI (@ANI) July 23, 2020
तर आज दिवसभरात राज्यात आज २९८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंदकरण्यात आली असून सध्या राज्यातील मृत्यू दर ३.७ % एवढा झाला आहे. तसेच, सध्या राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५ हजार २२२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १७,३७,७१६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ (२० टक्के) कोरोना नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, राज्यात आज एकूण १ लाख ९४ हजार २५३ Active रुग्ण आहेत.
हेही वाचा – मटणावर ताव मारायला कैदी गेला घरी आणि…