मुंबई | “वाट आहे संघर्षाची… म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा”, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला एक वर्ष झाल्यानंतर आता राज्यात दुसरा राजकीय बंड झाला आहे. हे बंड अजित पवार यांनी केले आहे.
अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी आज शपथ घेतली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणता मोठा भूकंप आला आहे. महाराष्ट्रात आता पहिल्यांदा दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. रोहित पवारांनी ट्वीट म्हणाले, “वाट आहे संघर्षाची… म्हणून थांबणार कोण? सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा… मग संघर्षाला घाबरतंय कोण? लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच…”, असे ट्वीट केले आहे.
वाट आहे संघर्षाची…
म्हणून थांबणार कोण?
सह्याद्री सोबत आहे महाराष्ट्र सारा
दऱ्या खोऱ्यातून अन् गाव शिवारातून वाहणारा वारा…
मग संघर्षाला घाबरतंय कोण?
लढणं आणि जिंकणं हे तर महाराष्ट्राच्या रक्तातच… pic.twitter.com/fORmLbW6tk— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 2, 2023
स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी – आदित्य ठाकरे
अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत म्हणाले, एक सिद्ध झाले, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे! आता ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’, अशी ही लढाई असणार आहे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे, असे म्हटले आहे.
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न –
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 2, 2023