घरमहाराष्ट्रफडणवीसांपेक्षा आदित्य ठाकरेंमध्ये जास्त 'टॅलेंट'; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राणेंचा राऊतांना टोला

फडणवीसांपेक्षा आदित्य ठाकरेंमध्ये जास्त ‘टॅलेंट’; व्हायरल व्हिडीओ प्रकरणी राणेंचा राऊतांना टोला

Subscribe

सिंधुदुर्ग : मुंबईतील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्लू अर्जुनच्या श्रीवल्ली या हिट गाण्यातील काही ओळी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही त्यांच्यासाठी सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा ठेवू, असे म्हटले होते. यासंदर्भात आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Aditya Thackeray has more talent than Devendra Fadnavis Nitesh Rane taunt to Sanjay Raut in viral video case)

नितेश राणे यांना संजय राऊतांच्या वक्तव्यावर विचारले असता ते म्हणाले की, सर्व पक्षीय बैठक बोलावून देवेंद्र फडणवीस यांचं गाणं ऐकण्यापेक्षा जास्त टॅलेंट आदित्य ठाकरेंमध्ये आहे. पुरुष असतानासुद्धा तो महिलेच्या आवाजात गाऊ शकतो. हे टॅलेंट फार क्वचित लोकांमध्ये असतं. आदित्य ठाकरेंसाठी पाहिजे तर मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये कार्यक्रम लावतो, ‘आदित्य ठाकरे का अनोखा अंदाज’, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा – त्यांचे खबरी त्यांना अडचणीत आणतील; राऊतांच्या ‘त्या’ शब्दावर शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या व्हायरल व्हिडीओवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोणत्याही राजकारण्याकडे कौशल्य, कला असेल तर त्याने गायले पाहिजे. तो माणूस नाही का? त्याच्याकडे कला आहे. त्याची पत्नीही गाते. ते राजकारणविरोधी नक्कीच आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं गाणं गात असतील तर आम्ही सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा आयोजित करू आणि त्यांना त्याठिकाणी गाण्यासाठी बोलवू, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

- Advertisement -

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गायक जावेद अलीसोबत पुष्पा द राइजमधील ‘श्रीवल्ली’ गाणे गाताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हिंदीतील ‘श्रीवल्ली’ गाण्याला आपला आवाज देणारे गायक जावेद अली यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माईक धरला आणि त्यांनी आपल्या सुंदर आवाजात ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या काही ओळी गायल्या.

हेही वाचा – ललित पाटील प्रकरण हिवाळी अधिवेशनात मांडणार; काँग्रेस आमदाराचे सरकारवर टीकास्त्र

दरम्यान, अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा द राइज’चा ज्वर चाहत्यांमध्ये उतरत नाही आहे. आतापर्यंत लोकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आहे. ‘पुष्पा द राइज’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. अलीकडेच अल्लू अर्जुनने ‘पुष्प 2: द रुलचे’ पोस्टर रिलीज करून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -