घरदेश-विदेशचीनच्या कंपन्यांसोबतचे करार जैसे थे !

चीनच्या कंपन्यांसोबतचे करार जैसे थे !

Subscribe

सुभाष देसाई यांचे स्पष्टीकरण

मॅग्नेटक महाराष्ट्र २.० परिषदेत चिनी कंपन्यांसोबत झालेले करार राज्य सरकारने रद्द केलेले नाहीत. हे करार तूर्तास ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून, त्यावरील पुढील कार्यवाही प्रतिक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र सरकारने केलेले सामंजस्य करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आल्याचे ते यावेळी म्हणालेत.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे २५० कोटी, १ हजार कोटी आणि ३ हजार ७७० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-२ पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. एकूण ५ हजार २० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र सरकारकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, चीन आणि भारताच्या सीमेवर 20 जवान शहीद होण्याच्या आधी हे करार करण्यात आले होते. मात्र, सीमेवर 20 जवान शहीद झाल्यानंतर चीनविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे चीनच्या कंपन्यांबरोबर केलेल्या या करारांचं काय करायचं याचा सल्ला राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागितला होता. केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार चीनच्या कंपन्यांबरोबर करण्यात आलेले करार स्थगित करण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -