घरमहाराष्ट्र'माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई, सुप्रिम कोर्टात दाद मागणार' - धनंजय मुंडे

‘माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई, सुप्रिम कोर्टात दाद मागणार’ – धनंजय मुंडे

Subscribe

अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्स साठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमिनी कुणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकर्‍यांना व बँकांना ५४०० कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावुन धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश मा.न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. जगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

सदर जमिनीची खरेदी रजिस्ट्री ऑफीस अंबाजोगाई येथे खरेदी खताच्या आधारे करून तहसिल कार्यालय, अंबाजोगाई येथे फेरफार घेण्यात आलेली आहे. ती जमिन देवस्थानची नाही, या प्रकरणी चंद्रकांत गिरी आणि इतरांनी अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये जगमित्र शुगर मिल्सच्या नावाने न्यायालयात डिक्री झालेली आहे, असे असतांना चुकीच्या माहितीवरून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे आणि महसूल कागदपत्रे आपल्या बाजूने आहेत. यापूर्वी देखील आपल्यावर याच प्रकरणात अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेले असताना राजकीय त्रास देण्याच्या हेतूने एकाच प्रकरणामध्ये वारंवार नाव बदलून कोर्टाची दिशाभूल करून, खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतलेले आहेत.

- Advertisement -

या प्रकरणातील याचिकाकर्ते राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावई आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी ५४०० कोटी रूपयांची शेतकरी आणि बँकांची फसवणूक केली. या प्रकरणी आपण आवाज उठवल्यामुळेच राजकीय सूडबुद्धीतून त्यांचे जावई आपल्या विरूध्द न्यायालयात वारंवार तक्रारी करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातून आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल

आपण जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो त्यामुळे जाणीवपूर्वक प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर आपल्या विरुद्ध असे खोटे कारस्थान रचण्यात येते, असा आरोप ही मुंडे यांनी केला असून कितीही व्यक्तिगत हल्ले झाले तरी सरकार विरुद्ध आवाज उठवणे थांबवणार नाही आपला लढा सुरूच राहिल असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -