घरमहाराष्ट्रसोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असेपर्यंत आघाडीला धोका नाही

सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंचा पाठिंबा असेपर्यंत आघाडीला धोका नाही

Subscribe

अजित पवार यांचा विरोधकांना टोला

तीन पक्षांचे सरकार आल्यामुळे अजूनही विरोधकांच्या पोटात दुखत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. हे सरकार पाडण्यासाठी विरोधक अनेक प्रयत्न करत आहेत मात्र सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा असेपर्यंत या आघाडीला काहीही धोका नाही असेही ते म्हणाले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, विरोधकांनी दीड वर्षे सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांना वाटत होते मराठ्यांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी मोठे मोठे मोर्चे काढावेत, ओबीसींनी आरक्षण रद्द झाले म्हणून मोर्चे काढावेत. त्यांनी कायमच दुटप्पी भूमिका घेतली आहे. अर्थात विरोधकांचे कामच ते असते. पण तरीही जोपर्यंत सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांचा पाठिंबा आहे तोवर महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही.

- Advertisement -

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा वर्तवली असल्यासंदर्भात अजित पवार यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, आता तर सध्या उध्दव साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार, काम करण्याचा फॉर्मयूला ठरला आहे. तसेच नानानी इच्छा व्यक्त केली असेल, हा नाना यांना पूर्ण अधिकार आहे. शेवटी लोकशाहीमध्ये कोणीही जरी इच्छा व्यक्ती केली. तरी 145 मॅजिक फिगर ती मिळवावीच लागते. जे तो आकडा गाठू शकतील, जर उद्या तुम्ही गाठू शकला. तर तुम्ही देखील राज्याचे प्रमुख होऊ शकता.

मंगळवारी कोल्हापुरात होणार्‍या मूक आंदोलनाबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, संभाजीराजे यांनी आंदोलन करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत सर्वांना आहे. त्यांनी आंदोलन करावं पण करोना वाढणार नाही याची काळजी घेऊन करावं. त्याचबरोबर उद्या होणार्‍या आंदोलनात कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील तसंच हसन मुश्रीफ हेही सहभागी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे त्यावर ५ जुलै रोजी होणार्‍या राज्याच्या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -