घरताज्या घडामोडीपायऱ्यांवरची प्रतिविधानसभा बंद केली, तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर कारवाई

पायऱ्यांवरची प्रतिविधानसभा बंद केली, तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर कारवाई

Subscribe

जे घडलेच नाही अशा गोष्टी सांगून खुर्चीवरुन खोटं बोलून आमदारांना निलंबित केलं - फडणवीस

सत्ताधाऱ्यांनी कितीही दहशत केली आमचा आवाज बंद होऊ शकत नाही, बंद केला जाऊ शकत आम्ही या ठिकाणी सरकारचा विरोध करणार, विरोधात बोलणार आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या सदरा फाडणार त्यामुळे माध्यमांनी सहकार्य करावे, अध्यक्षांचा आदेश आहे सांगून माध्यमांना धक्काबुक्की केली आहे. ही एक प्रकारची आणीबाणी लावली आहे. आम्हाला बंदी केली तरी आम्ही प्रतिविधानसभा भरवणार असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सगळ्यांचा आक्रोश मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतुल काल खोटं आरोप करुन सदस्यांना निलंबन केलं आहे. शांतपणे आमचे प्रतिअधिवेशन सुरु होते. परंतु मार्शलांनी येऊन अधिवेशन बंद करुन माध्यमांवर दंडूकाशाही सुरु आहे. माध्यमांना त्रास देत असेल तर पत्रकार कक्षात आम्ही भाषण करु, आम्ही शांतपणे पुन्हा प्रतिविधानसभा सुरु करणार आहेत. आम्ही लवकरच आयोजन करुन पुन्हा प्रतिविधानसभा सुरु करु असा आक्रमक पवित्रा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

राज्य विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी तालिका अध्यक्षांच्या चेंबर आणि विधानसभा उपाध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यामुळ तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या १२ बड्या आमदारांना १ वर्षांसाठी निलंबीत केलं आहे. याचा निषेध करत भाजपने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच सरकारच्या कामाचा धिक्कार असो असा नारा दिला आहे. विधीमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत भाजपने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली आहे. या प्रतिविधानसभेचे अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांना नियुक्त केलं आहे. अशी घोषणा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिविधानसभेत सदस्यांना आपलं मत मांडण्याची संधी देण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले

या महाराष्ट्रातील शेतकरी, ओबीसी राजकीय आरक्षण, विद्यार्थी आणि एमपीएससीचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर सरकारमध्ये आवाज उठवला तर खोट्या आरोपाखाली निलंबित करण्यात येत आहे. जे घडलेच नाही अशा गोष्टी सांगून खुर्चीवरुन खोटं बोलून आमदारांना निलंबित केलं जात आहे. म्हणून आज या विधानसभेत या सरकारचा धिक्काराचा प्रस्ताव ठेवतो आहे. हा जो प्रस्ताव मांडतो आहे तो सरकारच्या विरोधात विनंती करतो आहे की, या प्रस्तावावर चर्चा सुरु करावी आणि त्या संदर्भात अनेक सदस्यांना आपलं म्हणणं या सरकारच्या विरोधात, वसूली भ्रष्टाचाऱ्यांचा पर्दाफाश करायचा आहे. सदस्यांनी नावे दिले आहेत त्यांना मत मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे.

- Advertisement -

स्पीकरची परवानगी कोणी दिली

भास्कर जाधव यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेवर आक्षेप घेतला आहे. विधीमंडळ परिसरात खासगी पत्रक वाटण्याचा आणि अशाप्रकारे जमाव करुन स्पीकर लावून भाषण करण्याचा अधिकार आणि परवानगी कोणी दिली. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांना चौकशी करण्याची विनंती केली आहे. पायऱ्यांवर विरोधी पक्षनेते आणि सदस्य बसले आहेत. त्या बसण्याला विरोध नाही परंतु त्यांच्याकडे स्पीकर आहे आणि ते भाषण करत आहेत. त्यांना अशा प्रकारची स्पीकरची परवानगी दिली आहे का? ही परवानगी दिली असेल तर त्याबाबत स्पष्टता द्या, अन्यथा ज्यांनी स्पीकर दिला असेल त्यांच्यावर कारवाई करा, विधानभवनाच्या सुरक्षा रक्षकांना बोलवले आणि त्यांना कारवाई करण्यास सांगितले तर कारवाई केली नसल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

विधानसभा उपाध्यक्षांनी काय म्हटलं

सभागृहाकडून विरोधी पक्षनेत्यांना पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवण्याची परवानगी दिली नाही. तसेच भाषण करण्यासाठी स्पीकर लावण्याची परवानगीही दिली नव्हती त्यामुळे ही परवानगी कोणी दिली आणि कोणाच्या परवानगीने भाजप नेत्यांनी प्रतिविधानसभा भरवली याबाबत चौकशी करण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी केली आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी माईक जप्त करण्याच्या सूचनाही विधानसभा उपाध्यक्षांनी दिल्या आहेत.

आपले कामकाज स्थगित करा

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर अजूनही भाजपचे भाषण सुरु आहे. राज्यातील मीडिया ते लाईव्ह करत आहे. त्यामुळे त्यांचे भाषण थांबवा नाहीतर आपलं कामकाज थांबवा अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.ॉ

विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक

मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे केली. आज विधानसभेत बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी कामकाजात आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे असेही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.

तालिका अध्यक्षांकडून आदेश

वीधीमंडळाच्या पायऱ्यांवर सुरु असलेल्या भाजप नेत्यांचे भाषण तात्काळ बंद करावे असे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले आहेत.

सुरक्षा रक्षकांनी भाजपची प्रतिविधानसभा थांबवली 

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सुरु असलेली प्रतिवीधानसभा बंद करण्याचे आदेश तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिले यानंतर सुरक्षा रक्षकांनी भाजपकडून माईक आणि भाषणांचे थेट प्रसारण थांबवले. यामुळे भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -