सध्या पावसाने राज्यात थैमान घातलं आहे. शनिवार रात्रीपासून सतत पावसानं चांगला जोर धरला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या लाईफलाईनवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील वाहतुक देखील विस्कळीत झाली आहे. पावसामुळे दुर्घटनेच सत्र पण वाढलं आहे. शनिवारी साताऱ्यात एक भीषण अपघात झाला. साताऱ्यातील कामरगावातील पाबळनाला धबधबा पात्रात एक कार कोसळून भीषण अपघात झाला. माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे कार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे.
अपघात झालेल्या चालकाचे नाव नितीन शेलार आहे. या कारमध्ये अजून एक व्यक्ती चालकासोबत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांची दुसऱ्या व्यक्तीला शोधण्याची मोहिम सुरू आहे. पण सध्या मुसळधार पावसामुळे या शोधकार्यास अडथळा निर्माण होत आहे.