घरताज्या घडामोडीगावांची जातिवाचक नावं रद्द होणार; ठाकरे सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत

गावांची जातिवाचक नावं रद्द होणार; ठाकरे सरकार पावलं उचलण्याच्या तयारीत

Subscribe

वाड्या-वस्त्यांची जातिवाचक नावं बदलणार असून आता त्याजागी शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी नावे देण्याचा विचार आहे.

राज्यातील खेडेगावांना ठेवण्यात आलेली जातिवाचक नाव बदलण्याची चिन्हे दिसून येत आहे. आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वस्त्या, वाड्यांना जातींवरुन ठेवलेली नावे रद्द करण्यासाठी ठेवलेली नावे रद्द करण्यासाठी ठाकरे पावले उचलण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत असून सामाजिक न्याय विभाग यासंबंधी प्रस्ताव आणणार असल्याची माहिती आहे.

यामुळे घेण्यात येत आहे निर्णय

वाड्या, वस्त्यांना देण्यात येणारी जातीवाचक नाव बदलून त्यांना शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी नावे ठेवण्याचा विचार आहे. याबाबत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी तसे संकेतही दिले होते. तसेच ‘काळानुसार काही निर्णय घेण्याची गरज असल्यामुळे या निर्णय घेतला जात असून यापुढे महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको,’ असे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्याचे मुंडेंनी सांगितले आहे.

- Advertisement -

वंचित घटकाला न्याय

वंचितातील वंचित घटकाला न्याय देण्यासाठी अनेद बदल करण्याची गरज आहे. यातून काही घटकांची मने दुखावली जातील, पण, याबाबत बदल होणे गरजेचे असून ते बदल होणारच, अशी खात्री मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

ग्रामीण भागात भेदाभेद

बऱ्याचदा जातिवाचक नावांमुळे ग्रामीण भागात भेदाभेद आणि विषमता पसरते. मात्र, समाजातील सर्व घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचा संदेश देण्यासाठी ठाकरे सरकार अशाप्रकारचा आगळावेगळा निर्णय घेण्याची शक्यता दिसून येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दोन अपत्य असणाऱ्यांनाच सरकारी सवलत द्या, राज्यसभेत खासगी विधेयक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -