घरमहाराष्ट्रमतदारांनी मतपेटीतून उत्तर दिले - छगन भुजबळ

मतदारांनी मतपेटीतून उत्तर दिले – छगन भुजबळ

Subscribe

मोदी सरकारचा चेहरा उघडा पडला असून त्यांच्या हुकूमशाही वृत्तीला मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून उत्तर दिले असल्याचे मत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

विकास हा परावलीचा शब्दाची घोषणा देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारचा चेहरा उघडा पडला असून त्यांच्या हुकूमशाही वृत्तीला मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून उत्तर दिले असल्याचे मत अ.भा. महात्मा फुले समता परिषदेच अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काॅंग्रसचे खा. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भुजबळ पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एनडीए सरकार मधुन नुकतेच बाहेर पडलेले माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह हे देखील उपस्थित होते.

काय म्हणाले भुजबळ

भुजबळ म्हणाले, विकासाच्या नावावर आता हे सरकार बोलायलाच तयार नाही. रोजगार, शेतक-यांच्याा मालाला हमीभाव, स्मार्ट सिटी या सर्व वल्गना ठरल्या आहेत आणि हे जनतेच्या लक्षात आले आहे. जनतेला सर्व कळते, ते जाहीर रित्या बोलत नसलेतरी त्यांचा रोष त्यांना मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. मोदींची लोकप्रियता कायम आहे असा भ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न भाजप सरकार करीत आहे पंरतू तो प्रयत्न फोल ठरत आहे. जनता त्यांचा रोष व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळी रस्यावरच उतरेल असे नाही, उघडपणे बोलेलच असे ही नाही पंरतू निकाल जनतेचा रोष आणि रोख कुठल्या दिशेने चाललेला आहे हे दिसून येत आहे, असे भुजबळ यांनी सुतोवाच केले.

- Advertisement -

“भाजप सरकारच उलटी गणती सुरु झाली असून त्यांनी जो अजेंडा समोर ठेऊन आमच्या सारख्यांना देखील भुलवले होते ते आमच्या सारखे सारेच सावध झाले आहेत. आम्हांला सामाजीक न्यायाच्या आणाभाका देण्यात आल्या होत्या . पंरतू त्यांचा केवळ संघाचा अजेंडा आहे आणि तो आम्हांला मान्य नाही.” – माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -