घरमहाराष्ट्रभाजपचे आमदार आमच्या संपर्कात; यशोमती ठाकूर यांचा गौप्यस्फोट

भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; यशोमती ठाकूर यांचा गौप्यस्फोट

Subscribe

नावं कळाली तर राज्यात भूकंप येईल

भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षा आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. संपर्कात असलेल्या आमदारांची नावं कळाली तर राज्यात भूकंप येईल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. शिवाय, महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आमच्यातून कोणीही फुटणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडीओ शेअर करत हा गौप्यस्फोट केला आहे.

“मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आता राजस्थानमध्ये भाजपने आपला घाणेरडं राजकारण सुरुच ठेवलं आहे. शेणातला किडा ज्याप्रमाणे शेणातच राहतो तसं यांचं झालं आहे. केंद्रात सत्ता असतानाही राज्यांमध्ये फोडाफोडी करण्याची डाव सुरु आहेत. मला सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय? असं विचारलं जातं. माझं सर्वांना सांगणं आहे, राज्यातलं सरकार स्थिर आहे,” असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राने देशाला नवं राजकीय समीकरण दिलं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

- Advertisement -

 

कार्यकर्ते सतत विचारत राहतात महाराष्ट्रात काय होईल, माझं सर्वांना सांगणं आहे राज्यातलं सरकार स्थिर आहे. कुणी हे सरकार अस्थिर करायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे.आमचे कुणी फुटणार नाहीत, उलट १०५ पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप होईल.

Posted by Adv. Yashomati Thakur on Thursday, 16 July 2020

जर कोणी सरकार अस्थिर करण्याचा किंवा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला चांगलं बडवू. आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी किती दिवस सहन करायची, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा,” असा इशारा देखील यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. “माजी मुख्यमंत्री ज्यांना घेऊन फिरत आहेत ते बाहेरुन आलेले लोक आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष किती दुर्बळ झाला आहे हे यावरुन दिसत आहे. त्यांच्या १०५ पैकी आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधीही परत येतील, याबद्दल तुम्ही हमी देऊ शकत नाही. उलट तुमच्या १०५ पैकी काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावं कळाली तर राज्यात भूकंप होईल,” असा गौप्यस्फोट यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -