घरताज्या घडामोडीCoronavirus: कर्फ्युनंतर लोकांची गावाकडे धाव; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

Coronavirus: कर्फ्युनंतर लोकांची गावाकडे धाव; ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

Subscribe

या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी किंवा त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्का मारण्यात यावा, अशी मागणी काही ठिकाणी होत आहे.

काल राज्यभर पाळण्यात आलेल्या जनता कर्फ्युनंतर पुणे- मुंबईमधील बरेच लोक आपापल्या गावी जाताना दिसत आहेत. काही ग्रामीण भागात पुणे आणि मुंबईहून आलेल्या लोकांबद्दल भितीचे वातावरण आहे. या लोकांची करोना टेस्ट करुन घ्यावी किंवा त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्का मारण्यात यावा, अशी मागणी काही ठिकाणी होत आहे. पुणे आणि मुंबईमध्ये काही करोना बाधित रुग्ण आढळलेले असले तरी या भागातून येणा-या लोकांबद्दल विनाकारण भिती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यावसायिकांनी ओपीडी बंद ठेवल्याचे आढळले आहे. अशा उद्रेक काळात उद्रेकाशिवाय इतर आरोग्य सेवा तसेच तातडीची वैद्यकीय सेवा जनतेला मिळणे आवश्यक असल्याने कोणीही ओपीडी अथवा इतर आरोग्य सेवा बंद ठेवू नयेत, असे कळकळीचे आवाहन आरोग्य खात्यामार्फत करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: आरोग्‍य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा; मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सुचना


नुकतेच परदेशाहून आलेले काही नागरिक होम क्वारंटाईन न पाळता घराबाहेर पडताना दिसत असल्याबाबतच्या तक्रारी राज्य हेल्पलाईनला प्राप्त होत आहेत. स्थानिक प्रशासनाने आपल्या कार्यक्षेत्राचे विभागवार वाटप करुन प्रत्येक क्षेत्रासाठी जबाबदार अधिका-याला होम क्वारंटाईन व्यक्तींची यादी देऊन प्रत्येकजण नियमाप्रमाणे विलगीकरण सूचनांचे पालन करत आहे का? याची खातरजमा करावी. यासाठी निवासी सोसायटीच्या समित्यांचीही मदत घेण्यात यावी, असे आदेश आरोग्य खात्याने दिले आहेत.

- Advertisement -

राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ८९

राज्यात नवीन १५ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी ११ जण मुंबईतील तर प्रत्येकी एक रुग्ण पुणे, ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबई भागातील आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ८९ झाली आहे. मुंबई आणि परिसरात आढळलेल्या १४ नवीन रुग्णांपैकी ९ जण हे यापूर्वीच्या कोरोना बाधित रुग्णांचे निकटसहवासित आहेत. इतर ५ जणांनी दुबई, मलेशिया, थायलंड, श्रीलंका,ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आदी देशात प्रवास केल्याचा इतिहास आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा:
पिंपरी चिंचवड मनपा – १२
पुणे मनपा – १६
मुंबई – ३५
नवी मुंबई – ५
नागपूर, यवतमाळ, कल्याण प्रत्येकी – ४
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी – २
पनवेल, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार प्रत्येकी १

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -