घरताज्या घडामोडीधोकादायक पुल, धरणांची सुरक्षितता तपासा : गमे

धोकादायक पुल, धरणांची सुरक्षितता तपासा : गमे

Subscribe

मान्सूनपूर्व तयारी बैठक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सज्जतेचे आदेश

पावसाळ्याच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, यासाठी विभागातील सर्व जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने नियोजनपूर्वक आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा. तसेच जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. बांधकाम विभागानेही पुलांचे निरीक्षण करावे असे सांगत मान्सूनच्या पार्श्वभुमीवर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठीही सज्ज राहा अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन सभागृहात मान्सुन-2021 पूर्व तयारीचा विभागीय आढावा, विभागीय दक्षता व नियंत्रण, महिला व बालकल्याण विशाखा समितीचा आढावा आणि कोविड-19 व्यवस्थापन तसेच अनुषंगिक विषयांचा दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी बोलतांना विभागीय आयुक्त गमे म्हणाले, मान्सूनच्या काळातील संभाव्य आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाचे आपत्ती निवारणासाठी नियोजन करुन सज्ज रहावे. तसेच प्रत्येक विभागाने चोवीस तास नियंत्रण कक्षाची स्थापना करुन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी. पूरप्रवण भागात शोध व बचाव साहित्य पोहच करणे आणि हे साहित्य चालुस्थितीत असल्याची खात्री करावी. जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास तात्पुरत्या निवारा जागांची निश्चिती करण्याच्या सूचना, गमे यांनी दिल्या.

- Advertisement -

पुरपरिस्थितीत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस विभागाने नियोजन करावे. तसेच सर्व पुलांचे निरीक्षण करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या सुस्थितीबाबत खात्री करावी. यासोबतच दरडी कोसळणे, वीज पडणे, झाडे रस्त्यावर पडून वाहतूक बंद होणे यावर संबंधित विभागाने व्यवस्था करावी. पुराचा धोका असलेल्या भागांना धोक्याची पूर्वसूचना देण्याकरिता जळगाव जिल्ह्याने तयार केलेल्या बहुउद्देशीय आपत्कालीन डिजीटल दंवडी सायरन प्रणाली इतर जिल्ह्यांनीही आपल्या जिल्ह्यात राबवावी. या सोबतच पुराचा धोका असणार्‍या गावांना हवामाना संबंधित वेळोवेळी दिल्या जाणार्‍या सूचना समाजमाध्यमांद्वारे पोहचविण्याबाबत प्रयत्न करावे, असेही विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी यावेळी सांगितले आहे. पुरपरिस्थिती निर्माण झाल्यास आपतग्रस्तभागातील नागरिकांना अन्न धान्य पिण्याचे पाणी, निवारा, कपडे इतर आवश्यक वस्तुंचा पुरवठा करुन पुरात घरे वाहून गेलेल्या निरश्रितांसाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करण्याचे नियोजन करावे अशाही सुचना यावेळी देण्यात आल्या.

तिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहा
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने विभागातील कोणत्याही जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता पडू नये यासाठी जिल्ह्यात तयार करण्यात येणार्‍या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, त्याचप्रमाणे कोविड काळात आपले दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी विभागीय दक्षता व सनियंत्रण समितीचा अंतर्गत दाखल झालेल्या गुन्हांची माहिती सर्व जिल्हाधिकारी यांनी सादर केली. त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा आस्थापनामध्ये 10 पेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या विशाखा समिती स्थापन करुन त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना विभागीय गमे यांनी यावेळी दिल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -