पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने रविवारी शिवसेनाखासदार संजय राऊत यांना अटक केली. यानंतर सोशल मीडियासह राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले –
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी कोणतीही यंत्रणा पुराव्याच्या आधारे काम करते. यंत्रणेने काम केले आहे. जे काही आहे, ते कोर्ट ठरवेल. या पेक्षा जास्त मला काही बोलायचे नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
केंद्रीय योजनांबाबत बैठक –
आज मुख्यमंत्र्यांनी केंद्रातील योजांबाबत बैठक घेतली होती. यावेळी पंधानमंत्री आवास योजना शहरी फक्त 12 टक्के पूर्ण झाली आहे. 17 लाख घरांचे टार्गेट असताना केवळ 12 टक्के घरे आपण बांधू शकलो आहोत. ही योजना कशी वेगाने पूर्ण करता येईल, यावर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत विविध केंद्राच्या योजनांचा आढावा घेऊन प्रत्येक विभागाला मुख्यमंत्र्यांनी टार्गेट दिले आहे. केंद्राने दिलेला पैसा खर्च झाला पाहीजे. सामान्य मानसाला याचा फायदा मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.