मुंबई – मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मातोश्रीवर लपून बसायचे आणि रश्मी ठाकरे वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटायच्या असा आरोप रामदास कदम यांनी केला होता. त्यांच्या या वाक्यावरून शिवसैनिकांनी त्यांचा समाचार घेतल्यानंतर रामदास कदमांनी त्यांचं वाक्य मागे घेतलं आहे. रश्मी ठाकरेंबद्दल मी असं बोलायला नको होतं, असं रामदास कदम म्हणाले.
रश्मी ठाकरेंबद्दल मी तसं बोलायला नको होतं, मी माझे शब्द मागे घेतो, मी अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, मी वास्तव ते बोललो. ठाकरेंचा अपमान होईल असं काही बोललो नाही, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.
सुषमा अंधारे कोण?
सुषमा अंधारे कोण, मी त्यांना ओळखत नाही, असा टोला कदमांनी लगावला आहे. तसंच, माझ्या मुलाला त्रास दिला, तीन वर्ष माझं तोंड बंद केलं, माझा गुन्हा काय असा सवालही रामदास कदम यांनी विचारला आहे.