घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपळसे चौफुलीवर भीषण अपघातात ३ ठार; एसटी जळून खाक

पळसे चौफुलीवर भीषण अपघातात ३ ठार; एसटी जळून खाक

Subscribe

नाशिक : तालुक्यातील नाशिक-पुणे महामार्गावर पळसे गावाच्या नजीक बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. एका कार चालकांने अचानक कार थांबवल्यामुळे मागून येणाऱ्या दोन बस आणि कार मध्ये जोरदार अपघात झाला. पळसे गावाच्या फाट्यावर अत्यंत धोकेदायक चौफुली असल्याने त्याठिकाणी मोठा गतिरोधक आहे. अपघात झाला त्यावेळी गतिरोधकाजवळ काही दुचाकीही होत्या. दुचाकीस्वारही या अपघाताचे शिकार झाले आहेत.

एसटी महामंडळाच्या दोन बस नाशिक कडून पुण्याच्या दिशेने जात असताना पळसे गावानजीक असलेल्या चौफुलीवर गतिरोधकाजवळ एका क्रेटा कारणे अचानक ब्रेक लावून कार थांबवली. कार अचानक थांबल्याने मागून येणाऱ्या एसटीने बस चालकाला बस नियंत्रित करता आली नाही. आणि यातून मोठा अपघात होऊन मागून येणाऱ्या दोन्हीही बस क्रेटा कारला धडकून अपघात झाला. याचवेळी गतिरोधकावर संथ गतीने जाणारे तीन दुचाकीस्वारही या अपघातांचे शिकार झाले.

- Advertisement -

दरम्यान, या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. तर ८ ते १० गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की अपघातानंतर एसटी बसने पेट घेतला. बसने पेट घेतला त्यावेळी अनेक प्रवासी बस मध्येच होते. त्यातील काही जखमी अवस्थेत होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. तसेच, जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -