घरमहाराष्ट्रओमनी कारला टेम्पोची धडक; ५ जणांचा मृत्यू

ओमनी कारला टेम्पोची धडक; ५ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मारूती ओमनी कारला टेम्पोने दिलेल्या धडकेत ओमनीतील तिघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कळंबोलीनजीकच्या टोलनाक्याजवळ सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. जखमींवर कामोठ्यातील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत पावलेले सर्व मानखुर्द येथील रहिवासी होते.

कसा झाला अपघात?

मानखुर्द येथील आठ मित्र ओमनी कारमधून लग्न कार्यासाठी पहाटे पुण्याच्या दिशेने निघाले होते. त्यांची गाडी कळंबोलीपासून सहा किलोमीटर अंतरावर गेली असता बंद पडली. ओमनी सुरू होत नाही. म्हणून त्यांनी ओमनीला धक्का मारत कळंबोलीच्या मार्गावर आणले. ओमनीला ढकलत ढकलत ते कळंबोतील गॅरेजमध्ये आणण्याचा प्रयत्न करीत होते. आदई नजीकच्या टोलनाक्याजवळ पाठीमागून भरधाव येणाऱ्या कलिंगड भरलेल्या टेम्पोच्या चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि त्या टेम्पोने ओमनीला मागून धडक दिली. या अपघातात आठ पैकी पाच जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या तिघांना कामोठ्यातील एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आले. एकावर उपचार सुरू असून दोघे सुखरूप आहेत. अपघातानंतर टेम्पो चालक फरारी आहे.

- Advertisement -

मृत

१) संतोष प्रजापती (४०)
२) रशीद नफिज खान (२४)
३) जुमन शौरतअली शेख (४५)
४) दिनेश जैस्वाल
५) अयोध्या यादव (२६)

जखमी

संजय राजभर (२८)
मुंद्रिका प्रसाद जैस्वाल (३६)

- Advertisement -

 

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -