घरताज्या घडामोडीबायकोला पळून नेणाऱ्या मित्राचा केला खून

बायकोला पळून नेणाऱ्या मित्राचा केला खून

Subscribe

विवाह करुन घरी आणलेल्या बायकोला पळून घेऊन जाणाऱ्या जिवलग मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली आहे.

अवघ्या वर्षभरापूर्वीच विवाह करुन घरी आणलेल्या बायकोला पळून घेऊन जाणाऱ्या जिवलग मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ जवळच्या भोयरगावात ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रंगराव घोटेकर या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

वर्षभरापूर्वी रंगराव घोटेकर याचा भाग्यश्री या तरुणीसोबत विवाह झाला होता. दरम्यान, रंगराव घोटेकर यांचा मित्र गणेश टेकाम यांने भाग्यश्रीला फूस लावून तिला पळवून नेले होते. याचा राग रंगराव घोटेकर याच्या डोक्यात राग होता. त्यांनी रागाच्या भरात बुधवारी सायंकाळी गणेशच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. त्यादरम्यान त्या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर या वादाचे रुपांतर झटापटीत झाले. मात्र, पत्नी भाग्यश्री आपल्या सोबत येन नाही हे पाहून चिडलेल्या रंगरावने गणेशला ठार मारण्याची धमकी देऊन तिथून निघून गेला.

- Advertisement -

मात्र, मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास रागात असलेल्या रंगरावने गणेशच्या घरात घुसून झोपेतच त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीत गणेशचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रंगरावने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, याप्रकरणी रंगराव याची पत्नी भाग्यश्री घोटेकरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रंगराव घोटेकरला अटक करण्यात आली.


हेही वाचा – पुण्यात १०९१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३५ जणांचा मृत्यू

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -