शिवसेनेवर टीका करणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत यांना शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा कडकनाथ कोंबडीची काळजी घ्यावी, असा टोला त्यांनी खोत यांना लागवला. शरद पवारांनी शिवसेनेला कधी गिळले हे त्यांना कळालं नाही अशी टीका केली होती.
यंदाच्या अर्थशंकल्पातील ६० टक्के निधी राष्ट्रवादी, ३०टक्के निधी काँग्रेस आणि १५ टक्के निधी हा शिवसेनेला मिळाला आहे. त्यामुळे पवारांच्या जवळ गेले, पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा नाही कळले, असं खोत म्हणाले. याशिवाय तानाजी सावंत यांनी काँग्रेस अंक राष्ट्रवादीवर केलेली टीका म्हणजे त्यांच्या मनातील खदखद आहे, असंही म्हणाले. यावरून मनीषा कायंदे यांनी खोत यांचा चांगलाच समाचार घेतला.
मनीषा कायंदे यांनी ट्विट करत खोत यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. “शरद पवार यांनी शिवसेनेला गिळले असे विधान थोर विचारवंत सदाभाऊ खोत यांनी केल्याचे वाचले. हे वाचून सदभाऊच्या राजकीय बुद्धीची कीव वाटली. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता आणि तळपता निखारा आहे. सदाभाऊ खोत सारखे काल-परवा भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनी शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा कडकनाथ कोंबडीची काळजी घ्यावी. निष्ठा वगैरे काय असते ते शिवसेनेला शिकवू नये,” असं ट्विट करत खोत यांना टोला लगावला आहे.
#शरदपवार यांनी #ShivSena ला गिळले असे विधान थोर विचारवंत सदाभाऊ खोत यांनी केल्याचे वाचले. हे वाचून सदभाऊच्या राजकीय बुद्धीची कीव वाटली. शिवसेना हा महाराष्ट्राची अस्मिता आणि तळपता निखारा आहे. #SharadPawar #Maharashtra@Sadabhau_khot @PawarSpeaks @ShivsenaComms @AUThackeray
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) March 30, 2022
सदाभाऊ खोत सारखे काल-परवा भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांनी शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा कडकनाथ कोंबडीची काळजी घ्यावी. निष्ठा वगैरे काय असते ते शिवसेनेला शिकवू नये.#Shivsena #SadabhauKhot @ShivsenaComms @AUThackeray @Sadabhau_khot pic.twitter.com/M9y4eOaTRk
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) March 30, 2022