घरमहाराष्ट्रनिपाह व्हायरस, आरोग्य विभागाचा राज्यात दक्षतेचा इशारा

निपाह व्हायरस, आरोग्य विभागाचा राज्यात दक्षतेचा इशारा

Subscribe

केरळमध्ये फिरायला जाताय तर सावधान…कारण, केरळच्या कोझिकोडे या भागात निपाह विषाणूने धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे मुंबई किंवा महाराष्ट्रातून केरळला फिरायला जाणाऱ्या आणि येणाऱ्या पर्यटकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी केलं आहे.निपाह विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात दक्षता घेण्यासाठी आरोग्य विभागाची तातडीची बैठक झाली. शिवाय, राज्य सरकारने पर्यटकांना खबरदारी घेण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

या विषाणूमुळे केरळमध्ये दहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. केरळमध्ये उद्भवलेल्या निपाह विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही, पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे. शिवाय, लोकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून या विषाणुचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधील कोझीकोडे आणि इतर परिसरातील प्रवास टाळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

कस्तूरबा रुग्णालयात विलगीकरण कक्ष –
राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये विशेष वॉर्डस तयार करण्यात यावे. तसंच डॉक्टर्स आणि नर्सेसने खबरदारी म्हणून मास्क आणि ग्लोव्हस वापरावे. राज्यात या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी सुद्धा खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना सूचीत करण्यात आले आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्याबाबतही सूचीत करण्यात आले आहे.

निपा विषाणूचा प्रसार –
या विषाणुचा प्रसार मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारी, रुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असते.

- Advertisement -

प्रतिबंधात्मक खबरदारी –
डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णाचे उपचार आणि शुश्रूषा करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वत्रिक सावधगिरीनुसार आवश्यक खबरदारी घ्यावी. शेतात, जंगलात अथवा इतरत्र पडलेली फळे खाणे टाळावे. निपा विषाणू आजाराच्या रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे.

या बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय-

  • राज्यातील सरकारी रूग्णालयांमध्ये विशेष वॉर्ड तयार करणे.
  • रूग्णालयातील डॉक्टर आणि परिचारीकांनी मास्क आणि ग्लोव्हस वापरावे.
  • मुंबईत कस्तुरबा हॉस्पिटल मध्ये स्वाईन फ्लूसाठी असलेले विशेष वॉर्डस अशा रुग्णांसाठी वापरावे.
  • केरळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी.

आरोग्य विभागाकडून यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याची यादी जाहीर करण्यात येणार आहे.

निपाह व्हायरसची लक्षणं-

  • ताप
  • अंगदुखी
  • डोकेदुखी
  • मरगळ
  • बेशुद्ध पडणं
  • मानसिक गोंधळ उडणं

उपचार-

या व्हायरसवर कोणतेही विशिष्ट औषधं नाही. मात्र या विषाणूविरोधी एक विशेष औषधं वापरलं जात असलं तरीही सपोर्टीव्ह केअरवर भर दिला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -