मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. सागर बंगल्यावरील या भेटीत दोघांमध्ये तासभर खलबतं झाली. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे-भाजपच्या नेत्यांची ही भेट युतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची समजली जात आहे. दरम्यान, जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू या, असं ट्विट राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरेंचं ट्विट काय?
सर्वांनी एकत्र मिळून महाराष्ट्राला वैभवाच्या शिखरावर नेऊया. तसेच जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवू या, असं ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे.
Together, let’s take Maharashtra to the pinnacle of glory. Create a Maharashtra that will be world’s envy.
Jai Hind! Jai Maharashtra!
Sincerely,
Raj Thackeray— Raj Thackeray (@RajThackeray) August 29, 2022
राज ठाकरे सातत्याने भाजपच्या हिंदुत्त्वाच्या मुदद्यावरून भूमिका घेत असल्याचे दिसते. यामुळे राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठींवर सर्वांचे लक्ष आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. ज्यानंतर अनेक दिवसांनी राज ठाकरे स्वत:च्या घराबाहेर पडून एखाद्या राजकीय नेत्याच्या भेटीसाठी गेले आहेत.
विशेष म्हणजे पुढच्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्याआधीच राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतली आहे. राज्यातील सत्तासंघर्ष तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
हेही वाचा : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा रुग्णालयात दाखल; तुरुंगात बिघडली