घरताज्या घडामोडीतारीख उलटली तरी पगार नाही; एसटी कामगार संघटना आक्रमक

तारीख उलटली तरी पगार नाही; एसटी कामगार संघटना आक्रमक

Subscribe

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाना आर्थिक तोट्याचा सामना करावा लागतो आहे. आर्थिक तोट्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणे एसटी महामंडळासाठी कठीण झालं आहे. अशातच १० तारीख उलटली तरी अद्याप कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाना आर्थिक तोट्याचा सामना करावा लागतो आहे. आर्थिक तोट्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देणे एसटी महामंडळासाठी कठीण झालं आहे. अशातच १० तारीख उलटली तरी अद्याप कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. त्यामुळे संतापलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने 10 तारीख उलटून गेल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. ()

राज्य सरकारकडून न्यायालयाचा अवमान सुरू असून शिंदे-फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच, प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि-सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण या महिन्याची 10 तारीख उलटून गेली तरी सरकार कडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही, हा न्यायालयाचा अवमान असून शिंदे- फडणवीस सरकारची ही कामगार विरोधी भूमिका उघड झाली आहे”, असे श्रीरंग बरगे यांनी सांगितले.

- Advertisement -

याशिवाय, “सरकार कर्मचाऱ्यांशी लबाडी करीत असून सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल”, असा इशाराही श्रीरंग बरगे यांनी दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दर महिन्याच्या 7 तारखेला कर्मचाऱ्यांना वेतन मिळत होते. पण या महिन्यात सुद्धा 10 तारखेलादेखील वेतन मिळालेले नाही. या विषयावर सरकार गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला. “संप काळात संप चिघळला जावा यासाठी फुकट अन्न धान्य पुरवणारे आता कष्टाचा महिन्याचा पगार वेळेवर द्यायला तयार नाहीत. ही लबाडी असून लवकरच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल. इतर सर्व संबंधितांना सोबत घेऊन पुढील दिशा ठरविली जाईल”, असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

भाजपावर गंभीर आरोप

विरोधी पक्षात असताना संपात कर्मचाऱ्यांच्या बाजूने बोलणारे भाजपनेते आता सत्तेत आल्यानंतर मूग गिळून गप्प बसले आहेत. भाजपाची संप काळातील भूमिका व आताची भूमिका पाहिली तर भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला असल्याचा हल्लाबोल बरगे यांनी केला. भाजपा नेते संप काळात बेंबीच्या देठापासून ओरडत सातवा वेतन आयोग मिळाला ही पाहिजे, विलीनीकरण झाले पाहिजे. वेतन वेळेवर मिळाले पाहिजे असे वारंवार बोलत होते. पण आता या विषयावर बोलायला तयार नाहीत. हे आता फार काळ सहन केले जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – बायकोच्या भरवशावर राजकारण करणारा.., राणांवर टीका करताना देशमुखांची जीभ घसरली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -