घरमहाराष्ट्रमुंबई महाराष्ट्राचीच राहिल! अजित पवारांचे सवदींना प्रत्युत्तर

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल! अजित पवारांचे सवदींना प्रत्युत्तर

Subscribe

मुंबई केंद्र शासित करावी

मुंबई महाराष्ट्राची होती…आहे… आणि राहिल, असे जोरदार प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले. कर्नाटकच्या नागरिकांना बरे वाटावे म्हणून त्यांनी अशा प्रकारचे विधान केले आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच करायला हवे, असेही पवार म्हणाले. मुंबई कर्नाटकात सामील व्हावी ही मराठी भाषिकांची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही. तोपर्यंत मुंबई केंद्र शासित करावी, अशी मुक्ताफळे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी उधळली आहेत. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा पवार यांनी आज समाचार घेतला.

बेळगाव आणि आसपासच्या मराठी गावांविषयी वाद आहे. तो मिटेपर्यंत तो भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत राज्य सरकारने सूचवले आहे. त्याचा मुंबईशी अर्थाअर्थी संबंध नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

सीमा भागात अनेक वर्षे मराठी आमदार, महापौर, नगरसेवक निवडून येत होते. नंतर तिथल्या मतदारसंघांची फेररचना केली. मराठी भाषिकांच्या गावांमध्ये इतर जास्त संख्येची कानडी गावे जोडली गेली आणि त्यातून मराठी आमदारांचे मतदारसंघ फोडले गेले. हा त्यांचाच भाग असल्याचे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दोन राज्यांबाबतच्या अशा वादामध्ये केंद्राने मध्यस्थी करून मार्ग काढायचा असतो, अशी अपेक्षाही अजित पवार यांनी व्यक्त केली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -