धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तब्बल ७० वर्षांपासून प्रलंबित असतानाही, सरकार त्याकडे लक्ष देत नसल्याचे सांगत सकल धनगर समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजावो आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात धनगर समाजाशी संलग्न विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाने आजवर विविध आंदोलनं, निदर्शनं केली. मात्र, तरीही सरकार लक्ष देत नसल्यानं हे आंदोलन केल्याचं संघटनेचे पदाधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले. सरकारने तातडीने आरक्षण द्यावे, समाजासाठी तरतूद केलेल्या निधीचा लाभ मिळावा, मेंढपाळांवरचं हल्ले थांबावेत या मागण्यांसाठी आंदोलन केल्याचंही त्यांनी सांगितले.