घरताज्या घडामोडीमाजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांचे निधन

माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांचे निधन

Subscribe

नाशिकरोड  येथील माजी नगरसेवक प्रकाश दामोदर बोराडे (५७) यांचे शुक्रवारी (दि.२८) सकाळी खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना निधन झाले, बोराडे यांच्या निधनाने नाशिकरोड, जेलरोड भागात शोककळा पसरली आहे. पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे, आठ दिवसांपुर्वी त्यांना त्रास झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी नंतर सध्या शिवसेनेचे पदाधिकारी म्हणुन काम केले, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशचे सचिव व नाशिक जिल्हा कबड्डी असोशिएशनचे खजिनदार या पदावर कार्यरत होते, कारकिर्दीत राज्य निवड चाचणी स्पर्धा, विविध कब्बडी, व क्रिडा स्पर्धांचे आयोजन केले होते. महानगर पालिकेतील पहिली व्यायामशाळा सुरु करणारे बोराडे यांनी पंचकला आनंदेश्वर व्यायामशाळा लोकवर्गणीतून सुरु केली होती.

- Advertisement -
अजातशत्रू 

नाशिकरोडच्या पंचक गावातून १९९२ पासून राजकिय कारकिर्दीला सुरुवात केलेले प्रकाश बोराडे हे अंबडच्या क्रॉम्पटन ग्रीव्हज कंपनीतील कुशल कामगार होते, कंपनीतील कामगारांचे प्रश्न मांडून ते सोडविण्याची हातोटी आल्याने कामगार नेते, म्हणुनही काम केले, २००३ साली स्वेच्छा निवृत्ती घेतली, कै. गोपाळराव गुळवे यांचे भाचे जावई असल्याने त्यांच्या घरात महानगर पालिकेचे तिकीट मिळून निवडून आले,पंचक, जेलरोड व नाशिकरोड भागात सामाजिक कार्य, मवाळ स्वभाव व दांडगा जनसंपर्क असल्याने नागरिकांनी १९९२ पासून अद्याप पर्यंत कधी ते तर कधी पत्नी रंजना यांनाच नगरसेवक म्हणुन निवडून दिले.

विकासाचा ध्यास

पंचक गावात गणेश एकता मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्याला सुरुवात केली, शिवनेरी प्रतिष्ठाण, बोराडे फाऊडेशन, समर्थ सेवा मंडळ आनंदेश्वर व्यायाम शाळा च्या माध्यमातून काम उभे केले होते, जेलरोड भागात वसाहत वाढल्याने याभागातल्या प्राथमिक गरजासांठी लोकांची मागणी जोर धरु लागली, त्यामुळे बोराडे यांनी युवकांच्या सहकार्याने व्यायामशाळा, पाणी ्प्रश्न, रस्ता रुंदीकरण, गार्डन, प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका धरला, जेलरोड भागात पाण्याचा प्रश्न गंभीर होता यावर महापालीकेनेही हात टेकले होते, चेहेडी पंपींग येथून पाणी पुरवठा कमी होत असल्याने अखेर पंचवटीतून नांदूर नाका मार्गे रहदारी पूलावरुन पाण्याची पाईपलाईन आणून जेलरोडचा पाणी प्रश्न सोडविला होता. यासाठी महापालिकेला पाणी पुरवठा कमी होत असल्याने चेहेडी बंधा-याचे कामही याच काळात सुरु होते, मात्र ठेकेदाराच्या दिरंगाई मुळे वेळ लागत असल्याने अखेर पंचवटीतून पाणी उपलब्ध करुन दिले होते, त्याच बरोबर चेहेडी बंधा-याच्या कामामुळे पळसे शिवारातील जमीनी वाहून गेल्याने शेतक-यांचा प्रश्न महापालिकेत ठामपणे मांडला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -