एनसीबीने अटक केलेला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा आणि भाजपचा कनेक्शन काय?, अमृता फडणवीसांच्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा कसा काय? असे सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ड्रग्जचा कारभार सुरु होता असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात ड्रग्जची तस्करी आणि वसुली सुरु होती. एक ड्रग्ज पेडलर गाण्याचा फायनान्स हेड, त्या गाण्यात फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अभिनय करतात असे सांगत नवाब मलिकांनी भाजपवर अनेक आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अमृता फडणवीस आणि ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्या कनेक्शनबद्दल खुलासा केला आहे. एक ड्रग्ज पेडलर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या सोबत फोटो काढतो. हा फोटो सार्वजनिक जीवनात कोणासोबत काढतो तसा नाही तर जुनी ओळख असल्या सारखा फोटो आहे. दिल्लीच्या एनसीबी झोनल युनिटने अटक केलेला ड्रग्ज पेडलर जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये आहे. परंतु त्याचा अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो आणि तो अमृता फडणवीसांच्या गाण्याचा फायनान्स हेड आहे. यावरुन नवाब मलिकांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
Details of ‘River Song’ which shows Jaydeep Rana as Finance Head.
Song sung by Ms. Amruta Fadnavis
Video shows Devendra Fadnavis and Sudhir Mungatiwar as actorshttps://t.co/LddkleoTaQ pic.twitter.com/lWnq2d4wF6— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 1, 2021
काय आहे प्रकरण?
मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्जच्या तस्करीवरुन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी म्हटलं आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने नदी स्वच्छता अभियानावर गाणं गायले आहे. या गाण्याचा दिग्दर्शक सचिन गुप्ता, गायक सोनू निगम आणि अमृता फडणवीस आहेत. तर गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. एक ड्रग्ज पेडलर महाराष्ट्रातील गाण्याचा फायनान्स हेड कसा काय असा प्रश्न नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे. तसेच या गाण्यात देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा अभिनय केला आहे. फडणवीस आणि जयदीप राणा यांच्याती घनिष्ठ संबंध आहेत. फडणवीसांच्या काळात राज्यातील ड्रग्जचा कारभार छुप्या पद्धतीने सुरु होता असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे.