घरCORONA UPDATEत्यामुळे गावात भांडणे सुरू झाली; नितेश राणेंची सरकारवर टीका 

त्यामुळे गावात भांडणे सुरू झाली; नितेश राणेंची सरकारवर टीका 

Subscribe

मुंबई आणि पुण्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा इतर जिल्ह्यातून मुंबई-पुण्यामध्ये येण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर चाकरमानी पुरते निराश झाले असून, आता या मुद्द्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने एकदाच काय ते मुंबईमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांबद्दल धोरण निश्चित करावे. जिल्हा प्रशासनाकडून कधी फॉर्म, कधी नाव मागितली जात आहेत. कधी भरलेले फॉर्म परत घेतले जात आहेत. त्यामुळे गावात भांडणे सुरू झाली आहेत. सरकारने उशीर होण्याआधी स्पष्टीकरण द्यावे, असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.

- Advertisement -

काय आहे राज्य सरकारचा नवा आदेश 

  • राज्य सरकारने काढलेल्या या नव्या आदेशानुसार पोलीस आयुक्तालय असलेल्या शहरामध्ये (उदा. औरंगाबाद, नागपूर) आंतरराज्य किंवा आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी देण्याचे अधिकार संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांना आहेत.
  • असे असले तरीही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रामधील नागरिकांना महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात जाण्यास अथवा त्या जिल्ह्यातून या प्राधिकरण क्षेत्रात येण्यास परवानगी नाही.  मात्र, या दोन्ही प्राधिकरण क्षेत्रातून महाराष्ट्राबाहेर (विशेषत: मजुरांना) जाण्याच्या परवानगी आहे.
  • अशा परवानगीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात संपूर्ण माहितीसह मेडिकल प्रमाणपत्रासह अर्ज करता येईल. सर्व पोलीस ठाण्याची माहिती एकत्र करून त्या विभागांच्या पोलीस उपआयुक्तांकडे पाठविली जाईल. अर्जाची छाननी करून नियमानुसार आणि तेथील कोविड-19 प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करून पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
  • कृपया अर्धवट किंवा अनाधिकृत किंवा सांगोवांगी दिल्या जाणाऱ्या माहितीवर विसंबून कोणीही धावाधाव करू नये, अशी विनंती देखील राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा –

IFSC मुंबईतून हलवण्याला पवारांचा विरोध, मोदींना लिहिले पत्र

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -