घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : आता करोनाचा फटका कारागृह प्रशासनालाही बसला

करोना व्हायरस : आता करोनाचा फटका कारागृह प्रशासनालाही बसला

Subscribe

कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर व्हावा, यासाठी न्यायालयाला विनंती करणार असल्याची माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात करोनाचा प्रादर्भाव झपाट्याने वाढत असून त्याचा फटका आता कारागृह प्रशासनाला बसल्याचे दिसून येत आहे. कारागृहातील कैद्यांमध्ये कोणाला करोनाची लागण झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जावू शकते. त्यामुळे कच्च्या कैद्यांना तात्पुरता जामीन मंजूर व्हावा, यासाठी न्यायालयाला विनंती करणार असल्याची माहिती राज्याच्या कारागृह विभागाचे महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सुनील रामानंद म्हणाले की, राज्यात एकूण ४५ ठिकाणी ६० कारागृह आहेत. त्यात आजमितीला ३८ हजार कैदी आहेत. राज्याच्या कारागृहातील साडेआठ हजार कैद्यांना शिक्षा झाली आहे. मात्र ज्यांच्यावर खटला चालू आहे किंवा जे कच्चे कैदी आहेत, त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध व्हायचा आहे. त्यांना तात्पुरता किंवा नियमित जामीन मिळावा. यासाठी न्यायालयात विनंती करणार आहोत. अशा कैद्यांची यादी बनवून न्यायालयाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे कारागृहातील गर्दी कमी करण्यास तसेच खबरदारी घेण्यास मदत होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – करोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थर रोड कारागृहातून ४०० कैदी हलवले


 

कैद्यांना नातेवाईकांस भेटण्यास बंदी

दरम्यान पुढील १५ दिवस कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांना घरच्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कारागृहांमध्ये करोनाला रोखण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. कारागृहात येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची दारात तपासणी करण्यात येणार आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यांची किंवा कैद्यांची लक्षणे करोनासदृश्य दिल्यास त्यांना तात्काळ विलगीकरण करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -