घरमहाराष्ट्रविजयदुर्ग समुद्रात अपघातग्रस्त जहाजातून तेल गळती सुरू; देवगड, मालवण, वेंगुर्लासह गोव्यातील किनाऱ्यांना...

विजयदुर्ग समुद्रात अपघातग्रस्त जहाजातून तेल गळती सुरू; देवगड, मालवण, वेंगुर्लासह गोव्यातील किनाऱ्यांना बाधा

Subscribe

विजयदुर्ग – विजयदुर्ग समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात 16-सप्टेंबर रोजी अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून अखेर तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या आठ चौरस किलोमीटर परिसरात झालेली आहे. गोव्यातील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ जहाजातून होणारी तेल गळती अपघात ठिकाणापासून दक्षिण-पूर्व दिशेला म्हणजेच आग्नेय दिशेला पसरणार आहे. त्यामुळे देवगड, मालवण, वेंगुर्ला किनाऱ्याबरोबरच गोव्यातील किनारेदेखील बाधित होणार आहेत. तेलगळती आजपासून अधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विजयदुर्ग ते देवगड दरम्यान ४० ते ५० वाव पाण्यात ‘पार्थ’ हे १०१ मीटर लांबीचे तेलवाहू जहाज १६ सप्टेंबर रोजी अपघातग्रस्त झाले होते. रत्नागिरी कोस्ट गार्डकडून प्राप्त माहितीनुसार जहाजातून सोमवारी तेल गळती सुरू झाल्याचे निदर्शनास आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठकीत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक बंदर अधिकारी संदीप भुजबळ, पोलिस निरीक्षक सागरी सुरक्षा बल अनिल जाधव, वेंगुर्ल्याचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव, वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे, देवगड तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत उपस्थित होते.

- Advertisement -

प्रतिबंधक उपाय जारी

तेल गळती रोखण्यासाठी रत्नागिरी कोस्ट गार्डकडून या भागात २५० लिटर ऑईल स्पील डिस्परसंटची फवारणी व स्वच्छता पथकाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -