घरताज्या घडामोडीमनोज जरांगेंची ती सभा नाही तर 'जरांगे जत्रा' - गुणरत्न सदावर्ते

मनोज जरांगेंची ती सभा नाही तर ‘जरांगे जत्रा’ – गुणरत्न सदावर्ते

Subscribe

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. उपोषणानंतर मनोज जरांगे पाटलांनी राज्यभराच संवाद यात्रा काढली. या संवाद यात्रेची सांगता जालन्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेने झाली. या सभेसाठी विशेष तयारी करण्यात आली होती. या सभेत मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या बांधवांशी संवाद साधला. जवळपास हजारोच्या संख्येने मराठा समाजाचे बांधव या सभेला उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं. उपोषणानंतर मनोज जरांगे पाटलांनी राज्यभराच संवाद यात्रा काढली. या संवाद यात्रेची सांगता जालन्यातील आंतरवाली सराटी येथे झालेल्या सभेने झाली. या सभेसाठी विशेष तयारी करण्यात आली होती. या सभेत मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या बांधवांशी संवाद साधला. जवळपास हजारोच्या संख्येने मराठा समाजाचे बांधव या सभेला उपस्थित होते. एकीकडे जरांगे पाटलांची ही सभा मराठा आरक्षणासाठी महत्त्वाची असतान दुसरीकडे मात्र वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या सभेवर टीका केली आहे. (On Maratha Reservation Gunratna Sadawarte Criticize Manoj Jarange Patil)

नेमकं काय म्हणाले गणुरत्न सदावर्ते?

- Advertisement -

“जातीवर आधारित सभांना आम्ही समर्थन देत नाही. हा देशासाठी मोठा धोका असतो. त्यामुळे मनोज जरांगेंच्या सभांना केवळ मी एका जत्रेसारखं पाहतो. याठिकाणी लोक येतात आणि मौजमजा करुन निघून जातात. त्याप्रकारे त्याठिकाणी काही वैचारिक घडलं नाही. त्यांचे बोलणं मग्रुरी आणि माजोरीपणाचं होतं. यावरुन त्यांच्या अकलेची कुवत उघडी पडली आहे”, अशी टीका वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना समज द्यावी; लाखोंच्या जाहीर सभेत जरांगे पाटलांची मागणी

- Advertisement -

“काहीतरी मृगजळ दाखवून लोकांना एकत्र आणून गलिच्छ राजकारण केले जात आहे. हे राजकारण शरद पवार हेच करत आहेत. त्यांचाच मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा आहे. माझ्या ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेवर टीका त्यांनी केली. पण, ही घोषणा जातीवाचक नाही. ही गोष्ट सैन्यातील आहेत. त्यामुळे ते काहीही बोलत होते. बरगळत होते. त्यांनी अत्याचाराची भाषा केली. पोलिसांना धमकी दिली. आम्ही तक्रार आणि नोटीस रितसर दिली आहे. गुन्हे जे यांनी मागच्यावेळी केले आहेत. बसेस जाळल्या, यांच्याकडून वसुली करण्यात येईल. जो समाज कायम राज्यकर्ता आहे. हा समाज सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नाकारला आहे. त्यामुळे आरक्षण मागणीवर नाही तर परिस्थितीवर असते”, असे गणुरत्न सदावर्ते म्हणाले.

“आज सुद्धा जरांगे स्वत:ला पाटील म्हणतात. पाटीलकी कोणाकडे असते. उच्च वर्गासाठी पाटीलकी असते. त्यामुळे आरक्षण उच्च वर्गासाठी नसते. जरांगेंचे राजकीय बॉस वेगळेच आहेत. शरद पवार त्यांच्या पाठिशी आहेत. जरांगे पाटील यांना काही ज्ञान नाही. संविधानाचं ज्ञान नाही. काही आकलन नाही. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षणाचा आम्हाला आदर आहे. स्वत:ला मराठा म्हणता मग ओबीसींमधून आरक्षण कशाला मागता. परिस्थिती कळाली पाहिजे. तुमच्याच बोलण्यातून ते फेल झालं आहे. सारथीला बजेट सुद्धा देता येत नाही. कारण उन्नत समाजला निधी देता येत नाही. मागास समाजासा निधी देता जात नसून सारथीला निधी दिला जात आहे. यात काही विरोधाभास आहे”, असेही गणुरत्न सदावर्ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -