घरमहाराष्ट्रमानवनिर्मित वणवे ठरतायंत वन विभागाची डोकेदुखी

मानवनिर्मित वणवे ठरतायंत वन विभागाची डोकेदुखी

Subscribe

 दुर्मीळ वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर

घटदाट जंगलात झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासून आग, अर्थात वणवा लागण्याचे दिवस कधीच इतिहास जमा झाले असून शेती, शिकार आदी कारणांसाठी जंगलात वणवे लावण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या मानवनिर्मित वणव्यामंध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचे नुकसान होत आहे. शिवाय दुर्मिळ वन्यजीवांच्या जातीदेखील नष्ट होऊ लागल्या आहेत. अनेक उपाय करूनही वणवे थांबण्याचे नाव घेत नसल्याने हे वणवे रायगड जिल्ह्याच्या वन विभागाची डोकेदुखी ठरू लागली आहे.

दरवर्षी जंगलात वणवे लागतात. त्यात प्रचंड नकसान होत असते. याला आळा घालण्यासाठी अलिबाग वन विभागाने ‘फायरब्ला’ या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्याचबरोबर वणवे विझविण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या ‘हॅलो फॉरेस्ट’ या शीघ्र प्रतिसात देणार्‍या हेल्प लाईनचाही नागरिकांडून वापर केला जात आहे. तरीही वणवे लागण्याचे प्रमाण कमी होत नाही. गेल्या महिनाभरात रायगड जिल्ह्यात 36 ठिकाणी लहान-मोठे वणवे लागले.

- Advertisement -

दारूभट्टी लावण्यासाठी जंगल परिसरात वणवे पेटवले जातात. जिल्ह्याच्या ग्रामीण शेतकरी शेतात पिके चांगली यावीत, या उद्देशाने दरवर्षी आपल्या शेतात राब भाजतात. शेताच्या जवळच डोंगर असल्याने शेतातील पालापाचोळ्याची ही आग पसरत जाऊन वणव्याचे रूप धारण करते. शेतकरी रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतातील गवत जाळतात. यामुळेही मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठीही मुद्दाम वणवे लावले जातात. या वणव्यांमुळे औषधी वनस्पती, किटक, जिवाणू, सर्प, पक्षी, सरडे, पाली, ससे, हरणे, कोल्हे, लांडगे आदी वन्य प्राण्याचे जीवन धोक्यात आले आहे.

या वणव्यांना आळा घालण्यासाठी उप वनसंरक्षक (अलिबाग) यांच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या 11 परिक्षेत्रांना ‘फायरब्लॉ’ ही अद्ययावत यंत्रे देण्यात आली आहेत. या यंत्राद्वारे फायर लाइन मारणे, आग विझवणे यासारखी कामे जलद करता येतात. स्थानिक वन समितीच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. या बरोबरच वणवे विझविण्यासाठी वन विभागाने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वन विभागातर्फे जाळरेषा (फायर लाइन ) हा प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात वणवे लागण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.

- Advertisement -

जिल्ह्यात 35 हजार हेक्टर खासगी, 1 लाख 7 हजार हेक्टर सरकारी वनक्षेत्र आहे. कर्नाळा, फणसाड ही अभयारण्ये आहेत. यात अत्यंत दुर्मिळ वन्य प्रजातींचे वास्तव्य असते. घुबड, चंडोल, रॉबिन, रानकोंबड्या, मोर, भेकर, बिबटे यांच्यासह काही दुर्मीळ फुलपाखरांच्या जाती रायगडमधील जंगलांमध्ये आढळतात. वणव्यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. दगडफूल, श्वेतांबरी, पानफुटी, टोपली कारवी, रानकेळी, संजीवनी, सर्पगंधा, अश्वगंधा यासारखी वनऔषधी आढळतात. वणव्यांमुळे यांचेही अस्तित्व धोक्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -