घरमहाराष्ट्रनाशिकमुक्त विद्यापीठाने दोन हजार रुपयांसाठी विद्यार्थ्यांचे निकाल रोखले

मुक्त विद्यापीठाने दोन हजार रुपयांसाठी विद्यार्थ्यांचे निकाल रोखले

Subscribe

नाशिक : ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाने दोन हजार रुपयांच्या पुननोंदणी शुल्क वसुलीसाठी तब्बल चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल रोखले आहेत. या विद्यार्थ्यांना पुननोंदणी शुल्काची दोन दोन हजार रुपये भरल्याची पावती सादर केल्यानंतर निकाल वितरित करणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

मुक्त विद्यापीठातील पुर्ननोंदणी प्रक्रिया अंतर्गत शुल्क भरल्याची पावती सादर करणार्‍या आणि प्रक्रिया पूर्ण न करणारे सुमारे 4 हजार विद्यार्थ्यांचे ऑगस्ट 2021 परीक्षेतील निकाल रोखण्यात आले आहेत. पुन्हा नोंदणीचे शुल्क भरल्याची पावती सादर केल्यानंतरच हे निकाल विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. मात्र विद्यापीठांनी शुल्क वसुलीसाठी घेतलेल्या धोरणामुळे होणार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची पडताळणी केल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेला प्रवेश देण्यात आला का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -

मुक्त विद्यापीठाची परीक्षा नियंत्रक डॉ. भटू पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करून अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यानंतर परीक्षा देण्याची तरतूद आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना पुननोंदणीची सूचना देण्यात आली होती. मात्र काही विद्यार्थ्यांनी पुर्न नोंदणी शुल्क भरलेले नाही, अशा चार हजार विद्यार्थ्यांचे निकाल विद्यापीठाने रोखले आहेत. त्यांनी शुल्क भरल्याची पावती सादर केल्यास निकाल वितरित केले जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -