घरताज्या घडामोडीमातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतोय, सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरेंच्या दिल्लीत बसण्याच्या...

मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतोय, सदाभाऊ खोतांचा आदित्य ठाकरेंच्या दिल्लीत बसण्याच्या वक्तव्यावर टोला

Subscribe

शिवसेना आता राष्ट्रीय स्तरावर निवडणुका लढवण्यावर भर देत आहे. देशातील सर्वच राज्यात निवडणूक लढवणार असून दिल्लीत २०२४ मध्ये शिवसेनेची सत्ता असेल तसेच दिल्लीत बसून लोकांच्या हिताची काम करण्यात येतील असे वक्तव्य शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. युवराजांच्या बोलण्यावर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टोला लगावला आहे. घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतोय असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कितीही दबाव टाका परंतु २०२४ ला लाल किल्ल्यावर हा आवाज घुमणार असल्याचे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.यावर सदाभाऊंनी ट्विट करुन म्हटलं आहे की, 2024 मध्ये आपण सर्व दिल्लीमध्ये बसणार म्हणजे बसणारच – आदित्य ठाकरे, घरातून केलेला कारभार बघता मातोश्रीचं नाव दिल्ली ठेवण्याचा विचार दिसतो. अशा शब्दात सदाभाऊंनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना दिल्लीच्या तख्तावर बसणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. २०२४ ला हे सगळं थांबेल दिल्लीत बसून हे सगळं थाबवेल असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. तसेच कार्यकर्त्यांच्या गर्जनेची हाक लाल किल्ल्यावर घुमणार म्हणजे घुमणार अशी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांच्या भेटीचा पुरावाच नाही, सुप्रिया सुळेंनी राज्यपालांचा दावा काढला खोडून

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -