घरमहाराष्ट्रदुष्काळ दूर होण्यासाठी वारकऱ्यांचे तुकारामांकडे साकडे

दुष्काळ दूर होण्यासाठी वारकऱ्यांचे तुकारामांकडे साकडे

Subscribe

यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी समाधानी होऊ दे अशी याचना यावेळी वारकऱ्यांनी संत तुकारामांकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यासह विदर्भात दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. मुळातच वारकरी हा शेतकरी असल्याने तो देवाकडे धाव घेत आहे. राज्यभरासह मराठवाडा येथील दरवर्षी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजयांच्या पालखी सोहळ्याला हजारो शेतकरी येत असतात. दुष्काळी परिस्थिती कायस्वरूपी निघून जावी, असे साकडे संत तुकाराम महाराज यांच्याकडे मराठवाड्यातून आलेल्या वारकऱ्यांनी घातले आहे.

वारकऱ्यांचे संत तुकारामांकडे साकडे

गेल्या काही वर्षांपासून लातूर, बीड, उस्मानाबाद तसेच विदर्भात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे. याचा फटका तेथील शेतकऱ्यांसह जनावरांना बसल्याच अवघ्या महाराष्ट्र राज्य पाहत आहे. राज्यकर्ते मात्र राजकारण करण्यापलीकडे काहीच करताना दिसत नाहीत. दुष्काळग्रस्त ग्रामीण भागातील तरुण तरुणी पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरात येऊन भर पोट भरण्यासाठी नोकरी शोधत आहेत. त्यामुळे गाव असो पडलेली आहेत. मान्सून राज्यभर दाखल झालेला असला तरी तो कधी हुलकावणी देईल याचा मात्र भरवसा देखील नाही. त्यामुळेच अनेक वारकरी हे देहूनगरीत दाखल झाले असून ते संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याकडे साकडे घालण्यात आले आहे. ग्रामीण भागात अत्यंत भयावह परिस्थिती असून आठवड्यातून एक वेळेस पिण्याचे पाणी मिळते का नाही हा प्रश्न आहे. तर जनावरांची देखील परवड होत आहे. यावेळी तरी मोठ्या प्रमाणा पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी समाधानी होऊ दे अशी याचना यावेळी वारकऱ्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – संत निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात पोलीस आयुक्तांची ‘अभंगवाणी’

हेही वाचा – ‘पालखी मुक्काम ठिकाणी मांसविक्री, दारु दुकानांवर बंदी’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -