घरमहाराष्ट्रनाशिक"ते भांग पित नसतील, पण...", ड्रग्ज रॅकेटवरून संजय राऊतांची गृहमंत्री फडणवीसांवर सडकून...

“ते भांग पित नसतील, पण…”, ड्रग्ज रॅकेटवरून संजय राऊतांची गृहमंत्री फडणवीसांवर सडकून टीका

Subscribe

ड्रग्ज रॅकेटच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका. तेही फार भरकटल्यासारखे बोलत आहेत, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक झाल्यानंतर ड्रग्जचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर नाशिक शहराला अंमली पदार्थांचा विळखा बसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील ड्रग्ज रॅकेट, अंमली पदार्थाचे सेवन वाढती गुन्हेगारी, रोलेट, बिंगोचे, जुगाराचे अड्डे , पोलिसांची निष्क्रियता या विरोधात ठाकरे गटाकडून भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. परंतु या ड्रग्ज रॅकेटच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका. तेही फार भरकटल्यासारखे बोलत आहेत, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे. (Sanjay Raut criticizes Home Minister Devendra Fadnavis over drugs racket)

हेही वाचा – ड्रग्जमाफियांकडून राजकारण्यांना मिळतो लाखो रुपयांचा मलिदा, संजय राऊतांचा दावा

- Advertisement -

नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणतात मोठे नेक्सस उघड होणार आहे. मात्र, नेक्सस उघड झाले आहे. फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका. तेही फार भरकटल्यासारखे बोलत आहेत. ते भांग पित नसतील, पण बहुतेक त्यांना त्याच्या वासाने नशा येत असेल. त्यांच्या आसपासची माणसे नशेच्या बाजारात फिरतात. त्या नशेबाजांमुळे फडणवीसांची थोडी मती गुंग झाली आहे.

तसेच, कसले नेक्सस उघड होणार आहे? देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत. राज्यात एक पिढी बरबाद होताना दिसत आहे आणि फडणवीस राजकारण करत आहेत. फडणवीसांच्या नागपूरमधील सरकारी बंगल्यावर एका पोलीस उपायुक्तावर भाजपा कार्यकर्त्याकडून हल्ला झाला. फडणवीस काय करत आहेत? असा संतप्त सवाल संजय राऊत यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

डीसीपीची कॉलर पकडण्यात आली. काय हे गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले आहेत. राज्याचे दुर्दैव आहे की, त्यांच्यासारखा गृहमंत्री राज्याला मिळाला आहे. बाळासाहेब देसाईंसारखा गृहमंत्री लाभलेल्या महाराष्ट्राला असा गृहमंत्री लाभणं दुर्दैव आहे. या महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री पाहिले आहेत. त्यांनी राजकारणापलिकडे जाऊन राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळली. त्यांनी सुडाने कधीही कारवाया केल्या नाहीत, असे मत संजय राऊत यांच्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -