घरताज्या घडामोडीमहंत नरेंद्र गिरींचा मृत्यू संशयास्पद, CBI चौकशी करुन सत्य बाहेर आणा, राऊतांची...

महंत नरेंद्र गिरींचा मृत्यू संशयास्पद, CBI चौकशी करुन सत्य बाहेर आणा, राऊतांची मागणी

Subscribe

महंत नरेंद्र गिरी आत्महत्या करतील असे मला वाटत नाही.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूने खळबळ माजली आहे. महंत गिरी यांचा मृतदेह सापडल्याने त्यांनी आत्महत्या केली का? हत्या करण्यात आली? असे प्रश्न निर्माण झाली आहे. त्यांच्या भक्तांना त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे. यामुळे नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कोणीतरी हिंदुत्वाचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काल ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आलं ते रहस्यम असल्याचे संजय राऊतांनी म्हटलं आहे. यामुळे महंत गिरी यांच्या मृत्यूचे कारण शोधले पाहिजे असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, महंत नरेंद्र गिरी हे मह्त्त्वाचे महंत होते. कुंभ मेळा, अयोध्येचं आंदोलन या सगळ्या हिंदुत्वाच्या लढाईमध्ये महंत पुढे होते. अनेकदा त्यांची भेट झाली आहे. त्यांचे आशीर्वाद हिंदुत्ववादी संघटना म्हणून शिवसेनेला मिळाले आहेत. अयोध्येत शिवेनाप्रमुख उद्धव ठाकरे जाणार होते. तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेतले होते. परंतु त्यांचा काल ज्या पद्धतीने त्यांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आलं ते रहस्यम आहे. आत्महत्या असली तरी त्यांच्या भक्तांना ती हत्या वाटत आहे. यामुळे त्याच्या मागे काय रहस्य आहे. ते जनतेला कळाले पाहिजे. यासाठी तपास होणं गरजेच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

सीबीआय चौकशी व्हावी

महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात काही साधूंना जमावाचा मारहाणीत मृत्यू झाला. तेव्हा देशभरातून आवाज उठला होता. परंतु नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण समोर आलं आहे. मला असं वाटत आहे की, हिंदुत्वाचा गळा उत्तर प्रदेशमध्ये घोटला आहे. याची चौकशीसुद्धा सीबीआयकडून व्हावी. जशी पालघर प्रकरणातील चौकशी निष्पक्षपाती करण्याचा प्रयत्न केला. तशीच त्यांच्या भक्तांची मागणी आहे की, नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून व्हावी. कारण आम्ही जेव्हा जेव्हा महंत नरेंद्र गिरी महाराजांना भेटलो तेव्हा ते मजबूत मनाचे, सगळ्यांना कवेत घेऊन मार्गदर्शन करणारे धर्मगुरु वाटले. ते आत्महत्या करतील असे मला वाटत नाही. कारणे शोधायला पाहिजे. ही कारणे कोणी शोधायची हे शोधायला पाहिजे असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : कोल्हापुरातून पळ काढलेल्या पाटलांना कोथरूडच्या जागेसाठी तोंडाला फेस आला होता, राऊतांचा घणाघात

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -