शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. बंडखोर आमदारांपैकी 10 ते 15 आमदार चंद्रकांत खैरे यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर शहाजी पाटलांनी त्यांना टोला लगावला आहे. ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडण्याचा त्यांचा उद्योग आहे. त्यांना काही येत नाही. त्यांना कळून चुकलेलं आहे, असा टोला शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटलांनी लगावला आहे.
शहाजी बापू पाटलांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, चंद्रकांत खैरे औरंगाबादला राहतात त्यांना काही गोष्टी माहित नसतात आणि ते उगाच ढगात गोळया मारत असतात. ढगात गोळ्या मारून वातावरण भांबावून सोडण्याचा त्यांचा उद्योग आहे. त्यांना काही येत नाही. त्यांना कळून चुकलेलं आहे. फक्त शेवटच्या गटांगळ्या मारतो माणूस, तसं त्यांच्याकडून गटांगळ्या मारण्याचे काम चालू आहे, असं शहाजी बापू पाटील म्हणाले.
गेलं दोन महिने महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले. काही राजकीय घटना घडल्या त्यामुळे सरकार बनलं. सरकार चांगलं सुरु आहे. हा सगळा अनुभव चांगला आहे. दोन महिन्यात सरकारचा कारभार चांगला असल्याने सरकारला यश येईल, असा विश्वास पाटलांनी यावेळी व्यक्त केला आहे.
हेही वाचा : विकासाची मेट्रो तुफान वेगाने धावणार असल्याचे सांगत चित्रा वाघ यांचा मविआला टोला