घरमहाराष्ट्रअजित पवारांच्या 'धर्मवीर'वरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अजित पवारांच्या ‘धर्मवीर’वरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Subscribe

Sharad Pawar | राज्यभरात राष्ट्रवादी पक्षाविरोधात वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी सावध भूमिका घेतली आहे. तसंच, येत्या काळात अजित पवार माध्यमांसमोर येऊन त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Sharad Pawar | मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) यांनी संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, असं म्हटलं होतं. यावरून राज्यात गदारोळ सुरू आहे. अजित पवारांची पाठराखण करताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी औरंगजेब क्रूर नव्हता, तो हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, असं म्हटलं. यावरून राज्यभरात राष्ट्रवादी पक्षाविरोधात वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांनी सावध भूमिका घेतली आहे. तसंच, येत्या काळात अजित पवार माध्यमांसमोर येऊन त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा – अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवावे आणि भाजपा मंत्र्यांनी माफी मागावी; राऊतांची टीका

- Advertisement -

छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यातही काही वावगं नाही. त्यामुळे धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक या बिरुदांबाबत तक्रार नाही. यावरून वाद नको. धर्मवीर आणि स्वराज्यरक्षक दोन्ही उपाधी योग्यच, असं शरद पवार म्हणाले. तसंच, अजित पवार त्यांच्या वक्तव्याचा खुलासा करण्याकरता लवकरच माध्यमांसमोर येतील, असं शरद पवार म्हणाले.

धर्मवीर काय धर्मरक्षक दोन्ही सारखेच. ज्या व्यक्तीला संभाजी महाराजांविषयी आस्था आहे त्यामागे जो विचार आहे त्या विचारातून ती आस्था असेल तर त्याबाबत वाद करण्याचं कारण नाही. धर्मवीर म्हणा किंवा स्वराज्यरक्षक म्हणा. राज्याचं रक्षा केल्याचं काम त्यांनी केलं. त्याची दखल घेतली तर त्यावर वाद करण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – नोटाबंदी म्हणजे आर्थिक हत्याकांड, त्याला जबाबदार कोण? संजय राऊतांचा SC ला सवाल

..त्यावर भाष्य करणार नाही

नोटाबंदी वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, याबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे, त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. त्यामुळे त्यांचा निर्णय स्वीकारावा लागेल.

हेही वाचा – संभाजी महाराज स्वराज्य रक्षक अन् धर्मवीरही

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -