घरताज्या घडामोडीलोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीत राम नको, फक्त विकास असायला हवा - शिवसेना

लोकसभेच्या २०२४च्या निवडणुकीत राम नको, फक्त विकास असायला हवा – शिवसेना

Subscribe

राम मंदिराच्या वर्गणीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या संपर्क अभियानाच्या पार्श्वभूमीवर आजच्या (सोमवार) सामनाच्या अग्रलेखातून भाजपला टोला लगावला आहे. राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो करसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? मुळात श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकवण्यासाठी बांधले जात असल्याची टिका शिवसेनेने भाजपवर केली आहे. तसेच यासंदर्भात प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत. पुढे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, ‘चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४चा निवडणूक प्रचार आहे, अशी टीका केली असून रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हातरी थांबवायलाच हवा. मंदिरानिर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच आहे. हे राम’!

आणखीन काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात?

‘अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरू होणार आहे. १४ जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक १२ कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असे विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय यांनी सांगितले. चंपतराय हे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस आहेत. अयोध्येत राममंदिरच व्हावे, असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. हा निर्णय देणारे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे निवृत्तीनंतर तत्काळ राज्यसभेचे खासदार झाले. रंजन गोगोई यांनी त्यांच्या अखेरच्या काळात वेगवान पद्धतीने या प्रकरणाची सुनावणी घेतली आणि राममंदिराबाबत सकाराम्त निर्णय घेतला. न्यायालयाचा निर्णय होताच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंदिराचे भूमिपूजनही झाले. मंदिराचे काम वेगाने सुरू झाले आहे. म्हणजे २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तंबूत विराजमान झालेले रामलल्ला मंदिरात विराजमान होतील’, असा टोला शिवसेनेने भाजपला लगावला आहे.

- Advertisement -

‘आता या मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतली. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे? मंदिरानिर्माणाचा खर्च साधारण ३०० कोटींच्या घरात आहे. मुख्यमंत्री योगी यांनी राममंदिर बांधकामात निधीची चिंता करू नये, असे बजावले आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे व त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य करणार?’, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

सामनाच्या या अग्रलेखावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करून शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. 

- Advertisement -


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी उच्चाधिकार समितीचा अहवाल वाचलेला नाही – फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -