घरदेश-विदेशSKYMET ने वाढवली बळीराजाची चिंता; वर्तवला हा अंदाज...

SKYMET ने वाढवली बळीराजाची चिंता; वर्तवला हा अंदाज…

Subscribe

 

नवी दिल्लीः यंदा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याचा अंदाज SKYMET ने वर्तवला आहे. यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. वाढत्या ऊन्हामुळे त्रस्त झालेले नागरिकांचीही SKYMET च्या अंदाजामुळे निराशा झाली आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाऱ्याचा निर्देशांक खाली उतरत नाही. अवकाळी पावसाने शेतकऱ्याला संकटात ओढले आहे. परिणामी पाऊस कधी पडणार या बातमीसाठी सर्वच आतूर झाले आहेत. यंदा पाऊस चांगला होणार आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD व स्कायमेटने वर्तवला आहे. पण मान्सून कधी दाखल होणार याचा अंदाज IMD ने वर्तवलेला नाही. मात्र स्कायमेटने मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार केरळामध्ये यंदा मान्सून उशिराने दाखल होणार आहे. जूनपर्यंत गरम हवामान कायम राहणार आहे. उत्तर भारतात १८ मे नंतर गडगडाट व वादळ असेल. दरवर्षी १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा त्याला उशिर होणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

यंदा जून ते सप्टेंबर या महिन्यांत सरासरीच्या केवळ ९४ टक्केच पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार अल-निनोच्या प्रभावामुळे देशात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांत पावसाची सरासरी ८५८.६ मिमी राहण्याची शक्यता आहे. गुजरातसह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मान्सूनच्या मुख्य महिन्यांत कमी पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांत हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवामान संस्थेने यावर्षी मान्सूनवर अल-निनोचा परिणाम होण्याचे भाकीत वर्तविले होते. आता स्कायमेटनेदेखील पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. नियोजन आयोगानेही कुठल्या राज्यात कोणते पिक किती येईल याचा अंदाज घेण्यास सुरुवात होईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -