गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील कमलापूर ते दामरंचा मार्गावरील रस्त्यांचे काम बंद करण्यासाठी नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी फेकून परिसरात दहशद निर्माण केली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक या योजनेतून २३ किलोमीटरच्या मार्गाचे काम सुरू आहे. परंतु, हे काम बंद करण्याचा इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे.
तीन महिन्यापूर्वी हत्ती कॅम्पमध्ये नक्षलवाद्यांनी धुमाकूळ घालून तोडफोड केली होती. आता पुन्हा नक्षलवाद्यांनी कामलापूर भागात आपले अस्तित्व दाखवून नागरिकांच्या मनात भीती पसरविण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित चिठ्ठीमध्ये तीन जणांची नावेही लिहिण्यात आली आहेत. चिठ्ठीमुळे नक्षलवाद्यांकडून विकास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
- Advertisement -
हेही वाचा – ‘पुरोगामी, दलित, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव’